शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

संपूर्ण जिल्हाच दुष्काळात

By admin | Updated: January 1, 2016 03:39 IST

दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ६० टक्के दाखवून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने

यवतमाळ : दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ६० टक्के दाखवून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. त्यानंतर सुधारित पैसेवारीत अर्धे तालुके ५० टक्केच्या आत दाखविण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अखेर गुरुवारी जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी ४५ टक्के घोषित करून संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात दोन हजार १५८ गावांपैकी दोन हजार ५३ गावांमध्ये पीक पैसेवारी ही ५० टक्क्यापेक्षा कमी आहे. ५० टक्क्यापेक्षा अधिक पीक पैसेवारी असल्यास त्या जिल्ह्यातील स्थिती उत्तम समजली जाते. शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्या पेक्षा कमी पीक पैसेवारी असल्यास तेथे दुष्काळी स्थिती आहे, अशी नोंद शासनाच्या लेखी घेतली जाते. यंदा सोयाबीन, कापूस ही रोख पिके शेतकऱ्यांच्या हातून निसटली आहे. खरिपातील ज्वारी व तुरीचाही भरोसा नाही. त्यामुळे खरिपाची पीक पैसेवारी ही ५० टक्के पेक्षा कमीच जाहीर करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. सुरुवातीला जाहीर झालेल्या नजरअंदाज व सुधारित पैसेवारीच्या आकड्यावर आक्षेप घेण्यात आला. पहिल्यांदा पैसेवारी कशी काढली जाते याचा उहापोह झाला. जिल्हा परिषदेत पैसेवारीवरून चांगलेच घमासाम झाले. पैसेवारीच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापत असतानाच जिल्हा प्रशासनानेही सावध भूमिका घेऊन सर्व तहसीलदारांंना तातडीच्या नोटीस बजावल्या. मंडळ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत पैसेवारी काढणाऱ्या समितीची सभा प्रत्येक गावात व्हावी, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर पीक पैसेवारीतील तफावत आज दिसून येत आहे. दुष्काळी स्थितीवर अंतिम पैसेवारीनेही शिक्कामोर्तब केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)