शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पीक विमा मिळवून देण्यासाठी कोण पुढाकार घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:30 IST

शासनाने पिकाच्या नुकसानाच्या बदल्यात शेतकऱ्यांना थोडीफार मदत दिली; परंतु पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत भेदभाव करीत मोजक्याच शेतकऱ्यांना ...

शासनाने पिकाच्या नुकसानाच्या बदल्यात शेतकऱ्यांना थोडीफार मदत दिली; परंतु पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत भेदभाव करीत मोजक्याच शेतकऱ्यांना विमा मंजूर केला. जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळांना विमा दिलाच नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले. सर्व शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणात पीक विमा मिळालाच पाहिजे, यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी राज्य सरकारकडे प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालून राज्य स्तरावर कृषिमंत्री, विमा कंपन्यांचे अधिकारी, संबंधित कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

बॉक्स

शासन, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक

या हंगामात सर्वच पिकांना जबर फटका बसला. सोयाबीनच्या उत्पादनात निचांकी घट आली. कापसाचे उत्पादनही निम्यात राहिले. पीक विमा कंपनीकडे भरलेल्या पैशाच्या तुलनेत विमा कंपनीने २० टक्के पैसेही शेतकऱ्यांना दिले नाही. यावर्षी पीक विमा कंपनीचा ८० टक्के फायदा झाला. विमा कंपनीने शेतकऱ्यांवर घातलेला हा दरोडा असल्याचे शेतकरी सांगत आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांसह शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून आपले उखळ पांढरे करून घेतले. विमा कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करण्याचा अधिकृत परवाना तर दिला नाही ना, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.