शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

खरे कोण? गावकरी की प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.

ठळक मुद्देआजंतीमधील पाणीटंचाई : दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम, टँकरमुक्तीच्या दाव्याविरूद्ध निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.पाणीटंचाई आजंती गावाच्या पाचवीला पुजली आहे. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गुंडभर पाण्यासाठी महिलांची दिवसभर भर उन्हात पायपीट सुरू असते. पाणीप्रश्न घेऊन लोकप्रतिनिधीकडे गेलेल्या शिष्टमंडळातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. अर्धवट पाईपलाईन, कोरड्या पडलेल्या विहिरी हे या गावचे आजचे चित्र आहे. या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आजंती टँकरमुक्त झाल्याचे जाहीर केले. या गावाला दरवर्षी नियमित टँकरची गरज भासत होती. मात्र नवीन योजना झाल्यापासून टँकर बंद झाले. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे, टंचाईसदृश परिस्थिती नाही, असा अहवाल जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे. गावात असलेल्या सहापैकी दोन चार विहिरींना पाणी असून, तीन विहिरीत नळ योजनेचे पाणी सोडले जाते. नऊ पैकी सहा हातपंप सुरू आहे. ४० खासगी विहिरी आहेत. ग्रामपंचायतीने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून नळ योजनेचे काम पूर्ण केले आहे, असे उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय ग्रामस्थांनी नळ योजनेवरून जोडणी घेणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.आता गावकऱ्यांनी प्रशासनाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे सांगत नेर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाची दिशाभूल केली आहे. मागील ५० वर्षांपासून गाव तहानलेले असताना जिल्हा परिषदेने वस्तूस्थिती लपविली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना सतीश अरसोड, आकाश गायकवाड, प्रीतम राठोड, नरेश राठोड, रवींद्र अवघड, घनश्याम ढगे, राजू काळे, प्रेमसिंह चौहान, अनिल काळे, कैलास ढगे, भूषण गुल्हाने, चंद्रकांत गुल्हाने, सागर गुल्हाने, उमेश ढळे, श्याम राऊत, शिवा कठाडे, अजय राऊत, मुनेश्वर अवघड, दिनेश वानखडे आदी उपस्थित होते.