शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

खरे कोण? गावकरी की प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.

ठळक मुद्देआजंतीमधील पाणीटंचाई : दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम, टँकरमुक्तीच्या दाव्याविरूद्ध निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.पाणीटंचाई आजंती गावाच्या पाचवीला पुजली आहे. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गुंडभर पाण्यासाठी महिलांची दिवसभर भर उन्हात पायपीट सुरू असते. पाणीप्रश्न घेऊन लोकप्रतिनिधीकडे गेलेल्या शिष्टमंडळातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. अर्धवट पाईपलाईन, कोरड्या पडलेल्या विहिरी हे या गावचे आजचे चित्र आहे. या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आजंती टँकरमुक्त झाल्याचे जाहीर केले. या गावाला दरवर्षी नियमित टँकरची गरज भासत होती. मात्र नवीन योजना झाल्यापासून टँकर बंद झाले. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे, टंचाईसदृश परिस्थिती नाही, असा अहवाल जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे. गावात असलेल्या सहापैकी दोन चार विहिरींना पाणी असून, तीन विहिरीत नळ योजनेचे पाणी सोडले जाते. नऊ पैकी सहा हातपंप सुरू आहे. ४० खासगी विहिरी आहेत. ग्रामपंचायतीने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून नळ योजनेचे काम पूर्ण केले आहे, असे उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय ग्रामस्थांनी नळ योजनेवरून जोडणी घेणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.आता गावकऱ्यांनी प्रशासनाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे सांगत नेर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाची दिशाभूल केली आहे. मागील ५० वर्षांपासून गाव तहानलेले असताना जिल्हा परिषदेने वस्तूस्थिती लपविली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना सतीश अरसोड, आकाश गायकवाड, प्रीतम राठोड, नरेश राठोड, रवींद्र अवघड, घनश्याम ढगे, राजू काळे, प्रेमसिंह चौहान, अनिल काळे, कैलास ढगे, भूषण गुल्हाने, चंद्रकांत गुल्हाने, सागर गुल्हाने, उमेश ढळे, श्याम राऊत, शिवा कठाडे, अजय राऊत, मुनेश्वर अवघड, दिनेश वानखडे आदी उपस्थित होते.