शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

खरे कोण? गावकरी की प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.

ठळक मुद्देआजंतीमधील पाणीटंचाई : दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम, टँकरमुक्तीच्या दाव्याविरूद्ध निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.पाणीटंचाई आजंती गावाच्या पाचवीला पुजली आहे. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गुंडभर पाण्यासाठी महिलांची दिवसभर भर उन्हात पायपीट सुरू असते. पाणीप्रश्न घेऊन लोकप्रतिनिधीकडे गेलेल्या शिष्टमंडळातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. अर्धवट पाईपलाईन, कोरड्या पडलेल्या विहिरी हे या गावचे आजचे चित्र आहे. या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आजंती टँकरमुक्त झाल्याचे जाहीर केले. या गावाला दरवर्षी नियमित टँकरची गरज भासत होती. मात्र नवीन योजना झाल्यापासून टँकर बंद झाले. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे, टंचाईसदृश परिस्थिती नाही, असा अहवाल जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे. गावात असलेल्या सहापैकी दोन चार विहिरींना पाणी असून, तीन विहिरीत नळ योजनेचे पाणी सोडले जाते. नऊ पैकी सहा हातपंप सुरू आहे. ४० खासगी विहिरी आहेत. ग्रामपंचायतीने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून नळ योजनेचे काम पूर्ण केले आहे, असे उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय ग्रामस्थांनी नळ योजनेवरून जोडणी घेणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.आता गावकऱ्यांनी प्रशासनाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे सांगत नेर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाची दिशाभूल केली आहे. मागील ५० वर्षांपासून गाव तहानलेले असताना जिल्हा परिषदेने वस्तूस्थिती लपविली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना सतीश अरसोड, आकाश गायकवाड, प्रीतम राठोड, नरेश राठोड, रवींद्र अवघड, घनश्याम ढगे, राजू काळे, प्रेमसिंह चौहान, अनिल काळे, कैलास ढगे, भूषण गुल्हाने, चंद्रकांत गुल्हाने, सागर गुल्हाने, उमेश ढळे, श्याम राऊत, शिवा कठाडे, अजय राऊत, मुनेश्वर अवघड, दिनेश वानखडे आदी उपस्थित होते.