शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना संरक्षण कुणाचे ?

By admin | Updated: April 26, 2017 00:13 IST

संपूर्ण यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असताना दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सर्रास खंडणी वसुली : वाहतुकीस अडथळा, अपघात वाढले यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असताना दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दारव्हा रोडवर पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरचे अतिक्रमण हटविले गेले. मात्र बुलडोजर त्यापुढे सरकला नाही. त्या मार्गावर अजूनही अतिक्रमण कायम आहे. हॉटेलांच्या आडोश्याने अतिक्रमणे थाटली गेली आहेत. तेथे आॅटोरिक्षा चालकांकडून काही टपोरी युवक खंडणी वसुली करतात. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आपले अतिक्रमण कुणीच काढू शकत नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या या अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेतील यंत्रणेतूनच संरक्षण मिळत असल्याची माहिती आहे. त्याबळावरच आजही हे अतिक्रमण कायम आहे. हे अतिक्रमण व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत दारव्हा रोडवरील व्यावसायिकांनी नगरपरिषद प्रशासनाची भेट घेतली. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी साकडे घातले जात आहे. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक मोहिमेच्या वेळी आज काढू, उद्या काढू अशी उत्तरे देऊन अतिक्रमण हटविणे टाळत आहेत. त्यामुळे त्या वादग्रस्त अतिक्रमणांना नगरपरिषद प्रशासनाची तर साथ नाही ना असा शंकेचा सूर दारव्हा रोडवरील व्यावसायिकांमधून ऐकायला मिळतो आहे. दारव्हा रोडवर दूरपर्यंत ही अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पाठफिरविताच पुन्हा अतिक्रमण बसविले जाते. अनेकदा संरक्षणामुळे खानापूर्ती म्हणून अतिक्रमण काढले जाते. हे प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे. दारव्हा रोडवर विशिष्ट अतिक्रमणांना संरक्षण देण्याचा प्रकार उघड झाला असला तरी हाच प्रकार शहराबाहेर जाणाऱ्या अन्य मार्गांवरही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने अशा प्रकरणात नगरपरिषदेमधील नेमके कुणाचे अतिक्रमणधारकांशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)