शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना संरक्षण कुणाचे ?

By admin | Updated: April 26, 2017 00:13 IST

संपूर्ण यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असताना दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सर्रास खंडणी वसुली : वाहतुकीस अडथळा, अपघात वाढले यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असताना दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दारव्हा रोडवर पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरचे अतिक्रमण हटविले गेले. मात्र बुलडोजर त्यापुढे सरकला नाही. त्या मार्गावर अजूनही अतिक्रमण कायम आहे. हॉटेलांच्या आडोश्याने अतिक्रमणे थाटली गेली आहेत. तेथे आॅटोरिक्षा चालकांकडून काही टपोरी युवक खंडणी वसुली करतात. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आपले अतिक्रमण कुणीच काढू शकत नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या या अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेतील यंत्रणेतूनच संरक्षण मिळत असल्याची माहिती आहे. त्याबळावरच आजही हे अतिक्रमण कायम आहे. हे अतिक्रमण व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत दारव्हा रोडवरील व्यावसायिकांनी नगरपरिषद प्रशासनाची भेट घेतली. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी साकडे घातले जात आहे. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक मोहिमेच्या वेळी आज काढू, उद्या काढू अशी उत्तरे देऊन अतिक्रमण हटविणे टाळत आहेत. त्यामुळे त्या वादग्रस्त अतिक्रमणांना नगरपरिषद प्रशासनाची तर साथ नाही ना असा शंकेचा सूर दारव्हा रोडवरील व्यावसायिकांमधून ऐकायला मिळतो आहे. दारव्हा रोडवर दूरपर्यंत ही अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पाठफिरविताच पुन्हा अतिक्रमण बसविले जाते. अनेकदा संरक्षणामुळे खानापूर्ती म्हणून अतिक्रमण काढले जाते. हे प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे. दारव्हा रोडवर विशिष्ट अतिक्रमणांना संरक्षण देण्याचा प्रकार उघड झाला असला तरी हाच प्रकार शहराबाहेर जाणाऱ्या अन्य मार्गांवरही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने अशा प्रकरणात नगरपरिषदेमधील नेमके कुणाचे अतिक्रमणधारकांशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)