शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दारव्हा येथील पाण्याची टाकी ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: May 13, 2016 02:42 IST

शहरातील आठवडीबाजार परिसरात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली.

लाखो रुपये वाया : अनेक भागात पाणी पोहोचतच नाहीदारव्हा : शहरातील आठवडीबाजार परिसरात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली. परंतु या टाकीवरून अनेक भागात पाणीच पोहचत नसल्याने ही टाकी पांढरा हत्ती ठरल्याचे दिसून येत आहे.सन २०११ मध्ये तब्बल ५४ लाख रुपये खर्च करून तीन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधकाम, ऊर्ध्व वाहिनी व वितरण व्यवस्थेची कामे करण्यात आली. मात्र तरीसुद्धा या परिसरातील रहिवाशांची तहान भागू शकली नाही. पूर्वीच्या वॉर्ड क्रमांक आठ या दलीत वस्ती वॉर्डातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे तेथील रहिवाशांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोयीकरिता पाणी टाकी व वितरण व्यवस्थेची कामे मंजूर करण्यात आली. २००९ मध्ये तांत्रिक मान्यता व २०१० मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टाकीचे बांधकाम करण्यात आले. टाकीचे बांधकाम झाल्यानंतर ऊर्ध्व वाहिनीचे काम करण्यात आले. १५० मिमी व १०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर डिसेंबर २०१२ पासून या योजनेवरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. एकूण ५३ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.याच टाकीवरून खाटीकपुरा परिसरात पाणीपुरवठा करण्याकरिता वाढीव काम करण्यात आले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. खर्च करूनसुद्धा त्या भागात पाणी पोहोचत नाही. त्याचबरोबर ज्या भागाकरिता लाखो रुपये खर्च करून टाकी बांधली, त्या वसाहतीमध्येसुद्धा व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन पाणीपुरवठ सुरळीत करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)कंत्राटदाराचे बिल काढू नकावाढीव काम केल्यानंतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याने कामात दुरुस्ती झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराचे बिल काढण्यात येवू नये, अशी मागणी मंगळवारला झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. या विषयावर चर्चा झाल्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला.