शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

कधी फिटेल अंधाराचे जाळे

By admin | Updated: May 15, 2016 02:00 IST

गेल्या दीड महिन्यापासून वणी शहर उजेड-अंधाराच्या सापसिडी खेळात भरडले जात आहे. मात्र नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक, ...

नगरपरिषद निगरगट्ट : वणी शहर अद्याप अंधारातच, तरी सारेच आहे बिनधास्तवणी : गेल्या दीड महिन्यापासून वणी शहर उजेड-अंधाराच्या सापसिडी खेळात भरडले जात आहे. मात्र नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांना त्याचे काहीच देणे-घेणे दिसून येत नाही. त्यामुळे ‘कधी फिटेल अंधाराचे जाळे’, असे म्हणण्याची वेळ वणीकरांवर आली.शहरातील पथदीवे देखभाल व दुरूस्तीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर सुरू आहे. यावर्षीची कंत्राटाची मुदत गेल्या ३१ मार्च रोजी संपली होती. त्यापूर्वीच नवीन निविदा काढून हे काम कंत्राटदाराकडे सोपविणे आवश्यक होते. मात्र मुख्याधिकारी व पदाधिकारी यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने निविदा काढली गेली नाही. १ एप्रिलपासून शहरावर अंधाराचे सावट येणार, हे माहीत असूनही त्याची तजवीज करण्यात आली नाही. यापूर्वीच्या कंत्राटदाराला मुदतवाढही देण्यात आली नाही. गेल्या १ व २ एप्रिलला संपूर्ण वणी शहर अंधारात होतो. त्यावेळी प्रशासनाची धावपळ सुरू झाली. त्यातही उपाययोजना करण्याचे सोडून मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी एकमेकांना जबाबदार धरून् ा एकमेकांवर चिखलफेक सुरू केली. दोन दिवसानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकरवी शहरातील पथदीवे सुरू व बंद करण्याची तात्पुरती व्यवस्था सुरू केली गेली. मात्र या कर्मचाऱ्यांना शहरातील सर्वच डी.पी. माहीत नसल्याने काही भागातील पथदीवे सुरू केलेच जात नव्हते. रात्री सुरू केलेले दीवे सकाळी उशिरापर्यंत बंदही केले जात नव्हते. त्यामुळे विजेचा अपव्यय होत होता.यानंतर पथदिवे देखभालीची निविदा काढण्यात आली. मात्र एकच निविदा आल्याने प्रक्रिया तेथेच अडकून पडली. परिणामी देखभालीचे काम एका कंत्राटदाराकडे देण्यात आले. मात्र तेसुद्धा काहींच्या पोटात दुखू लागले. नंतर दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यात तीन निविदा दाखल झाल्या. त्यामधील नागपूर येथील एका कंत्राटदाराची निविदा कमी दराची असल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. त्याला नुकताच कामाचा आदेश देण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा शहरातील पथदिवे बंद असल्याने शहरात पुन्हा अंधार दाटला आहे. मात्र आता कोणताही पक्ष किंवा सामाजिक कार्यकर्ता याबाबत बोलायला तयार दिसत नाही. नगरपरिषदेच्या निगरगट्टपणामुळे सर्वांच्याच भावना बोथट झाल्या आहे. आता नवीन कंत्राटदार तरी काम सुरू करतो, की नाही हे उद्या रविवारपासून कळणार आहे. नगरपरिषदेकडे स्वत:ची यंत्रणा नसल्याने जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ न देण्याचे कारण काय, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. आता जुने मुख्याधिकारी बदलून नवे मुख्याधिकारी रूजू झाले. तरीही नगरपरिषदेचा गाडा रूळावर का येत नाही, हा चिंतनाचा विषय आहे. (स्थानिक प्रतिनिधी)दुभाजकावरील पथदिव्यांचे कामही रखडलेशहरातील वरोरा रेल्वे गेट ते चिखलगाव गेट या रस्त्याच्या मधोमध पथदिवे लावण्याचे काम नागपूर येथील एका कंत्राटदाराला मिळाले. त्यांनी पथदिवे खांब व साहित्यही येथे आणून टाकले. पथदिवे खांब उभे करण्याचे बेस तयार करण्याचे कामही सुरू झाले. काही बेस तयारही करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा काम बंद करण्यात आले. या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. मात्र त्याचे कामही अद्याप सुरू झाले नाही. पथदिवे कंत्राटदार रस्त्याच्या बांधकामाची वाट पाहत आहे, की इतर कोणाच्या कारणामुळे पथदिव्यांचे काम बंद आहे, हे कळायला कोणताच मार्ग नाही.