शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

जब तुम सक्षम हो जाना, माँ के लिए एक झुला लाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:24 IST

आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाºया कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड दाद कविसंमेलनाच्या यशस्वीतेची पावती ठरली.

ठळक मुद्देकळंब येथे हास्य कविसंमेलन : ज्वलंत समस्यांवर प्रहार, बदलत्या संस्कृतीची मांडली व्यथा

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड दाद कविसंमेलनाच्या यशस्वीतेची पावती ठरली.येथील चिंतामणी देवस्थान समितीतर्फे आयोजित चिंतामणी जन्मोत्सवात प्रसिध्द हास्यकवी किरण जोशी, कपिल बोरुंदिया, नम्रता नमिता आणि डॉ.संतोष मुजुमदार यांनी विविध आशयाच्या विविधांगी कवितांचे सादरीकरण केले. त्यांचे शब्दरुपी फटकारे अनेकांना घायाळ करून गेले तर कधी गुदगुल्या व्हायच्या याचाही पत्ता लागायचा नाही. कधी डोळ्यात पाणी तर कधी अंतर्मुख करणारे शब्द मनाला भेदायचे.कपडे उतारणाही अगर सभ्यता हैतो हम बहोत अभागी हैक्यु की जानवर हमसेदो कदम आगे हैया कवितेतून किरण जोशी यांनी बदलत चाललेल्या संस्कृतीची व्यथा मांडली. त्यांचा शब्दनशब्द प्रत्येकाच्या मनाला भिडणारा होता. संस्कृतीचे होणारे अध्पतनावर त्यांची चिंता रास्तच होती.मेरा बेटा ये तो जाणता है कीपिताजीको अंग्रेजी मे फादर कहते हैमगर मेरा बेटा यह नही जाणता कीरिस्पेक्ट को हिंदी मे आदर करते हैया कवितेतून कपिल बोरुंदिया यांनी येणाऱ्या पिढीमध्ये पडत असलेले अंतर अतिशय खुबीने शब्दबध्द केले.जब तुम सक्षम हो जानामाँ के लिए एक झुला लानाया कवितेतून डॉ.संतोष मुजुमदार यांनी आईची महिमा कथन केली. आपल्या मुलांना लहानाचे मोठे करताना आईचे कष्ट मोजणारी फुटपट्टी अजूनही कोणाला निर्माण करता आली नाही. त्यामुळे मुलगा जेव्हा सक्षम होते तेव्हा आईची काळजी घेणे हे जबाबदारीच नाही तर सर्वांच प्रथम कर्तव्य आहे, असा या कवितेचा आशय होता.क्या करना क्या कर रहे अण्णाभुके रहके मर रहे अण्णाखानेवाले खाते रहेंगेतुम क्यु इतना डर रहे अण्णाया कवितेतून निगरगट्ट व असंवेदनशील नेत्यांचे वाभाडे काढण्यात कसर सोडली नाही.न जाने कितने सितारे है माँ के आंचल मेये वो जमीन है जो आसमान जैसी हैतुम्ही ने हक मुहब्बत का दिया हैमै अपना हक जताना चाहती हुंया कवितेतून भोपाळ येथून आलेल्या नम्रता नमीता या कवयित्रीने आईची महानता सांगितली. अमोल कडूकर यांनी संचालन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, सहसचिव राजेश भोयर पत्रकार न.मा.जोशी उपस्थित होते.