शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

बंद पडलेल्या रेल्वे गाड्या केव्हा पुर्ववत होणार, वणीकरांचा सवाल : वणी ते मुंबईसाठी घ्यावा लागतो खासगी वाहनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST

कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांत जाणाऱ्या अतिजलद रेल्वे बंद ...

कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांत जाणाऱ्या अतिजलद रेल्वे बंद पडल्या होत्या. त्या आता पूर्ववत सुरू झाल्या असून राज्यातील अनेक अति जलद रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत; परंतु वणीला थांबा असणारी रेल्वे गाडी अद्यापही सुरू झाल्या नाही. यासाठी आता खासदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बंद पडलेल्या वणी व वरोरावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी वणीवरून दररोज नागपूर व मुंबई जाणारी रेल्वे गाडी नंदीग्राम एक्स्प्रेस ही सकाळी ९ वाजता मुंबईसाठी जायची, तर दुपारी १ वाजता नागपूरकडे जाणाऱ्या या रेल्वेमुळे नागरिकांना मोठा लाभ होत होता. तसेच वरोरापासून मुंबई जाणारी सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर वर्धा पॅसेंजर ट्रेन, काझीपेठ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्याही बंद पडल्या आहेत. त्यामुळे चाकरमाने, विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीच या प्रकाराकडे लक्ष देऊन पूर्वीप्रमाणेच सुरू असलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यांचा नागरिकांना लाभ होणार असून वेळ व पैशाचीही मोठी बचत होणार आहे.