शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माणुसकीपुढे नियम जेव्हा नमतात; यवतमाळचा टमू आईकडे परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 10:39 IST

तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेशआनंदवनाला मुभा दिली, तशी सवईकरांनाही द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. त्याबाबत ‘लोकमत’ने ‘लाडका टमू आईला मुकला.. पिंजऱ्यात अडकला’ असे वृत्त प्रकाशित करताच समाजमन हळहळले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले. त्यामुळे मायलेकराचा साडेतीन महिन्यांचा विरह संपण्याची चिन्हे आहेत.काय आहे टमूची कहाणी? १२ वर्षांपूर्वी यवतमाळ-आर्णी मार्गाने प्रवास करत असताना यवतमाळच्या  नीलिमा सवईकर यांनी एक अपघात डोळ्यादेखत पाहिला. भरधाव ट्रकखाली एक गर्भवती माकडीण चिरडली. ते पाहून निलिमाताई थांबल्या. माकडीणीच्या पोटातून बाहेर आलेली आतडी हलताना त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर गर्भातून बाहेर पडलेला छोटा जीव त्यांना दिसला. माकडीणीचं ते बाळ निलिमाताईनी लगेच यवतमाळात आणलं. स्वत:च्या घरी त्याची शुश्रूषा सुरू केली. तीन वर्षे डॉ. अलोणे यांच्याकडून उपचार करवून घेतले. बरा होता होता आणि मोठा होता होता हा वानर सवईकर कुटुंबाचाच एक सदस्य बनला. त्याने वानरांची दुनियाच पाहिली नाही. पाहिले ते माणसांचेच कुटुंब.

माणसाळलेला टमू

टमूने माकडांचे जगच पाहिले नाही. तो पूर्णत: माणसाळलेला आहे. सवईकर कुटुंबीयांच्या सहवासाविना तो जेवतही नाही. अशा टमूला मार्च महिन्यात वनविभागाने अचानक हिरावून नेले. काही दिवस यवतमाळात आणि नंतर वर्ध्याच्या प्युपिल्स रेस्क्यू सेंटरमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. पण नीलिमा सवईकर, त्यांचा मुलगा प्रतिक यांनी ‘टिफिन’ नेल्याशिवाय टमू काहीही खात नाही.वनविभागाने त्याला पिंजऱ्यात ठेवले असून त्याला जंगलात सोडण्याच्या हालचाली आहेत. मात्र, तो माकडांना घाबरतो, जंगलात तो जगूच शकणार नाही, त्याच्या जीवनाची दोन-तीन वर्षे उरली आहेत, ते आयुष्य त्याला आमच्यासोबतच सुखाने जगू द्या, अशी मागणी नीलिमा सवईकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी यवतमाळच्या उपवनसंरक्षकांना सविस्तर लेखी आदेश देऊन टमूला नीलिमा सवईकर यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवनात शासनाने वन्यप्राणी ठेवण्याची मुभा दिली, त्याच धर्तीवर नीलिमा सवईकर यांना न्याय द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. आता या आदेशावर वनविभाग काय भूमिका घेतो, याकडे सवईकर कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्री, वनमंत्र्यांनाही पत्रशिवाय, यवतमाळच्याच अरविंद झाडे यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वर्ध्याचे वनसंरक्षक आदींना पत्र पाठवून टमूला सोडण्याची कळकळीची विनंती केली आहे. ‘लोकमत’ वृत्ताचा हवाला देत त्यांनी हे पत्र पाठविले असून आईसाठी तडफडत टमूचा मृत्यू झाल्यास वनविभागाचा कायदा जिंकेल पण माणुसकी मरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Monkeyमाकड