शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

पांढरकवडा पोलीस ठाण्याचे विभाजन होणार तरी केव्हा, दीड लाख नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:44 IST

तालुक्यातील मोहदा येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आहे. मात्र नवीन पोलीस ठाण्याची अद्याप निर्मिती ...

तालुक्यातील मोहदा येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आहे. मात्र नवीन पोलीस ठाण्याची अद्याप निर्मिती झालीच नाही. परिणामी तालुक्यातील १२५ गावांच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पांढरकवडा पोलीस ठाण्यातील सात अधिकारी व ५६ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

१४ ऑगस्ट २०१४ रोजी पांढरकवडा येथील नवीन पोलीस वसाहतीच्या उद्घाटनासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर .पाटील आले होते. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी (ग्रामीण), लोहारा, वसंतनगर (पूसद) आणि तालुक्यातील मोहदा असे चार नवीन पोलीस ठाणे मंजूर झाल्याची माहिती दिली होती. हे चारही पोलीस ठाणे लवकरच सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही या पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली नाही. तालुक्यात दरवर्षी गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, गेल्या दहा वर्षांच्या गुन्हेगारीचा आलेख थक्क करणारा आहे, असे असताना एक लाख ५० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेचा डोलारा केवळ येथील ६३ पोलिसांवर आला आहे. तालुक्यात १२४ गावे आहेत. क्षेत्रफळाने ही तालुका मोठा आहे. पूर्व आणि पश्चिम भागातील दोन टोकावरील गावाचे अंतर ४० ते ५० किलोमीटर आहे. तालुक्यातील ३० ते ४० टक्के भाग जंगलांनी व्यापला आहे. तालुक्याच्या मध्यभागापासून चौपदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या भागातील जमीन मध्यम प्रतीची आहे. सिंचनासाठी सायखेड सोडले तर कोणतेही मोठे धरण नाही. लहान-मोठे दहा-बारा तलाव व पाझर तलाव आहेत. परंतु सिंचन क्षमता कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जमीन कोरडवाहू आहे. हा तालुका आर्थिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे. मोहदा हे तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. परिसरात अनेक अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, मोहदा येथे ग्रामीण पोलीस ठाणे लवकरात लवकर व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

बॉक्स : दोन हजार नागरिकांच्या मागे केवळ एक पोलीस पांढरकवड्यात आज घडीला ६३ पोलीस कार्यरत आहे. त्यात दहा महिला पोलीस, तीन सहायक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, १३ हेडकॉन्स्टेबल ३७ शिपाई, एक निरीक्षक असे कर्मचारी कार्यरत आहे. ठाण्यात ६३ अधिकारी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यातील अनेक जण कोर्ट ड्युटी समन्स वॉरंट देण्यासाठी पाठविले जातात. मंत्री व्ही.आय.पी.च्या दौऱ्यासाठीही यातील कर्मचारी पाठविले जातात. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर पोलीस ठाण्याचे काम सुरू आहे. दोन हजार नागरिकांच्या मागे केवळ एक पोलीस उपलब्ध होतो. तीन शिफ्टचा विचार केल्यास एका शिफ्टला सहा हजार नागरिकांमागे एका केवळ एक पोलीस सुरक्षेला उपलब्ध होतो.