शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

जिल्हा बँकेवर प्रशासक केव्हा?

By admin | Updated: December 29, 2015 20:23 IST

संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला म्हणून अवघ्या महिनाभरातच अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (गोल बँक) प्रशासक बसविण्यात आला.

यवतमाळ : संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला म्हणून अवघ्या महिनाभरातच अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (गोल बँक) प्रशासक बसविण्यात आला. याउलट स्थगनादेशाचा आडोसा घेवून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ गेल्या तीन वर्षांपासून अतिरिक्त कारभार चालवित आहेत. या बँकेवर प्रशासक केव्हा बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युती सरकारची वर्षपूर्ती होवूनही बँकेवरील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कायम असलेले ‘प्रभारी’ संचालक मंडळ ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाच्या पाचही आमदारांचे सपशेल अपयश मानले जात आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाची मुदत संपल्याने सोमवारी, २८ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक श्रीमती एस.आर. डोंगरे यांना तेथे प्रशासक म्हणून नेमण्यात आले. अमरावतीतील या प्रशासकीय फेरबदलाने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनिष पाटील व संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०१२ मध्येच संपली. तेव्हापासून तेच संचालक मंडळ बँकेचा ‘अतिरिक्त कार्यभार’ पाहात आहेत. बँकेच्याच संजय जोशी या संचालकाच्या न्यायालयीन लढाईने संपूर्ण संचालक मंडळाला गेल्या तीन वर्षांपासून अतिरिक्त कार्यभार पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. बँकेने नव्या रचनेत दुर्बल घटक हा मतदारसंघ गोठविला. त्याविरोधात संजय जोशी यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली व निवडणुकीला स्थगनादेश मिळविला. त्यावरून आता तीन वर्षे लोटत आहेत. मात्र स्थगनादेश कायम आहे आणि त्यावरील कारवाईही थंड बस्त्यात पडली आहे. केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. आता तर या केसची नेमकी तारीख काय, हे कुणालाही सांगता येणार नाही. कारण न्यायालयात याप्रकरणाकडे शासनाचेच दुर्लक्ष होते आहे. त्यात शासनातर्फे गेल्या तीन वर्षांपासून शपथपत्र व माहिती सादर केली गेली नाही. हीच बाब विद्यमान संचालक मंडळाच्या फायद्याची असल्याने त्यांनीही त्यासाठी आग्रह धरला नाही. उलट शपथपत्र दाखल करण्यास आणखी विलंब कसा लावता येईल, यासाठी सहकार आयुक्तालय व सहकार मंत्रालयात संचालकांनी पूर्वीपासूनच फिल्डींग लावलेली असल्याचे व ती युती शासनातही कायम असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये बँकेच्या संचालक मंडळाला जे जमले ते युती सरकारमध्ये जमणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. युतीचे शासन येताच न्यायालयात शपथपत्र व आवश्यक माहिती सादर होईल आणि संजय जोशींना मिळालेला स्थगनादेश हटवून निवडणुका लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. ३१ आॅक्टोबरला भाजप-सेना युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र शपथपत्र न्यायालयात दाखल झाले नाही. पर्यायाने संपूर्ण वर्षभर आघाडीच्या विचाराचे संचालक मंडळ कायम राहिले. युती शासन असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि भाजपाच्या पाचही आमदारांना बँकेवर ना प्रशासक बसविता आला, ना निवडणुका लावून घेता आल्या. त्या तुलनेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे आमदार वजनदार ठरल्याचे दिसून येते. बँकेबाबत भाजप-सेनेची मवाळ भूमिका पाहता यवतमाळ जिल्ह्यात सहकार क्षेत्रात युतीचे नेटवर्कच नसल्याचे सिद्ध होते. युती शासनात आघाडीचे संचालक मंडळ बँकेवर गेली वर्षभर शाबूत राहिल्याने भाजप-सेनेच्या सहकार क्षेत्रातील मर्यादा उघड झाल्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)