शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेवर प्रशासक केव्हा?

By admin | Updated: December 29, 2015 20:23 IST

संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला म्हणून अवघ्या महिनाभरातच अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (गोल बँक) प्रशासक बसविण्यात आला.

यवतमाळ : संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला म्हणून अवघ्या महिनाभरातच अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (गोल बँक) प्रशासक बसविण्यात आला. याउलट स्थगनादेशाचा आडोसा घेवून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ गेल्या तीन वर्षांपासून अतिरिक्त कारभार चालवित आहेत. या बँकेवर प्रशासक केव्हा बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युती सरकारची वर्षपूर्ती होवूनही बँकेवरील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कायम असलेले ‘प्रभारी’ संचालक मंडळ ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाच्या पाचही आमदारांचे सपशेल अपयश मानले जात आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाची मुदत संपल्याने सोमवारी, २८ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक श्रीमती एस.आर. डोंगरे यांना तेथे प्रशासक म्हणून नेमण्यात आले. अमरावतीतील या प्रशासकीय फेरबदलाने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनिष पाटील व संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०१२ मध्येच संपली. तेव्हापासून तेच संचालक मंडळ बँकेचा ‘अतिरिक्त कार्यभार’ पाहात आहेत. बँकेच्याच संजय जोशी या संचालकाच्या न्यायालयीन लढाईने संपूर्ण संचालक मंडळाला गेल्या तीन वर्षांपासून अतिरिक्त कार्यभार पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. बँकेने नव्या रचनेत दुर्बल घटक हा मतदारसंघ गोठविला. त्याविरोधात संजय जोशी यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली व निवडणुकीला स्थगनादेश मिळविला. त्यावरून आता तीन वर्षे लोटत आहेत. मात्र स्थगनादेश कायम आहे आणि त्यावरील कारवाईही थंड बस्त्यात पडली आहे. केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. आता तर या केसची नेमकी तारीख काय, हे कुणालाही सांगता येणार नाही. कारण न्यायालयात याप्रकरणाकडे शासनाचेच दुर्लक्ष होते आहे. त्यात शासनातर्फे गेल्या तीन वर्षांपासून शपथपत्र व माहिती सादर केली गेली नाही. हीच बाब विद्यमान संचालक मंडळाच्या फायद्याची असल्याने त्यांनीही त्यासाठी आग्रह धरला नाही. उलट शपथपत्र दाखल करण्यास आणखी विलंब कसा लावता येईल, यासाठी सहकार आयुक्तालय व सहकार मंत्रालयात संचालकांनी पूर्वीपासूनच फिल्डींग लावलेली असल्याचे व ती युती शासनातही कायम असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये बँकेच्या संचालक मंडळाला जे जमले ते युती सरकारमध्ये जमणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. युतीचे शासन येताच न्यायालयात शपथपत्र व आवश्यक माहिती सादर होईल आणि संजय जोशींना मिळालेला स्थगनादेश हटवून निवडणुका लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. ३१ आॅक्टोबरला भाजप-सेना युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र शपथपत्र न्यायालयात दाखल झाले नाही. पर्यायाने संपूर्ण वर्षभर आघाडीच्या विचाराचे संचालक मंडळ कायम राहिले. युती शासन असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि भाजपाच्या पाचही आमदारांना बँकेवर ना प्रशासक बसविता आला, ना निवडणुका लावून घेता आल्या. त्या तुलनेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे आमदार वजनदार ठरल्याचे दिसून येते. बँकेबाबत भाजप-सेनेची मवाळ भूमिका पाहता यवतमाळ जिल्ह्यात सहकार क्षेत्रात युतीचे नेटवर्कच नसल्याचे सिद्ध होते. युती शासनात आघाडीचे संचालक मंडळ बँकेवर गेली वर्षभर शाबूत राहिल्याने भाजप-सेनेच्या सहकार क्षेत्रातील मर्यादा उघड झाल्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)