शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

किन्ही जवादे आश्रमशाळेची दुरावस्था

By admin | Updated: November 15, 2014 02:12 IST

येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी ...

किन्ही(जवादे) : येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी विद्यार्थ्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यासाठी व आंघोळीसाठी पाणीच मिळत नाही. विद्यार्थ्यांना शाळेपासून ५०० मिटर लांब असलेल्या गावातील स्मशानभूमीतील हँडपंपावर जावून आपले कपडे धुवावे लागतात तसेच आंघोळ करावी लागते. याबाबत मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली असून लवकरच यासंदर्भात योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिने झाल्यावरही या तक्रारींची दखलच घेतली गेली नसल्याचे दिसून येते. या शाळेने विद्युत बिल न भरल्यामुळे वीज कंपनीच्या वडकी कार्यालयाने शाळेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात विजेशिवाय राहावे लागले आहे. शाळेत सांस्कृतिक भवन आहे. परंतु या भवनावर टीन नाहीत. पावसाळ्यात तर या भवनात पाणी साचलेले असते. वादळामुळे उडालेली टीन अद्याप टाकण्यात आली नाहीत. शासनाने याठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प दिलेला आहे. परंतु तो शासकीय असल्यामुळे शिक्षकांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्याचे सुटे भाग शाळेच्या परिसरात तुटलेल्या अवस्थेत पडलेले दिसून येतात. शाळेचा परिसर गलिच्छ असून अशाच वातावरणात विद्यार्थ्यांना जेवण करावे लागते. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये सर्वत्र कचरा जमलेला आहे. अनेक शिक्षक या क्वार्टरमध्ये राहातच नाही. सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता शाळेत केवळ दोन शिक्षक उपस्थित होते. उर्वरित सर्व शिक्षक २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून ये-जा करतात. त्यामुळे ते वेळेवर पोहोचू शकत नाही. एकीकडे शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये शासन खर्च करते. परंतु अधिकारी व शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचे या मूळ हेतूला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. याकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून या आश्रमशाळेचा कारभार सुधारावा, अशी मागणी पालक वर्गांमधून होत आहे. (वार्ताहर)