शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

निवडणुकीतील दारूबंदीचे नियोजन काय?

By admin | Updated: July 24, 2015 02:12 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे.

एक्साईज-पोलिसांपुढे आव्हान : तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटीज्ञानेश्वर मुंदे यवतमाळजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे. यातून गावागावांत वाहणारा दारूचा महापूर रोखण्याचे खरे आव्हान पोलीस व एक्साईजपुढे आहे. तर तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटी लागणार आहे. आता दारूबंदीचे नियोजन काय? असा प्रश्न विचारला जात आहे.यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह गट ग्रामपंचायतीतही प्रचाराची चुरस दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास उरले असून प्रत्येक उमेदवार जीवाचे रान करीत आहे. निवडणूक आणि दारू असे ग्रामीण भागात जुनेच समीकरण आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत याचा अनेकांना प्रत्यय आला. आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. या निवडणुकीतही गावागावात दारूचे पाट वाहणार यात शंका नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलीच ‘झिंग’ चढली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराने ‘खास’ नियोजन केले असून ‘ड्राय डे’च्या काळात अडचण जाऊ नये म्हणून जय्यत तयारी चालविली आहे. (नगर प्रतिनिधी) दीड हजार मतदान केंद्रांसाठी तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २५ जुलै रोजी होणाऱ्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून तीन हजार १८६ पोलीस तैनात करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी एक हजार ५६२ मतदान केंद्रावर ६ हजार १८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून गावागावांतील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या बोलविण्यात आल्या आहेत. तब्बल दोनशे जवान यामध्ये असून जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हजार ९४४ पोलीस शिपाई , ९०६ होमगार्ड राहणार आहेत. रात्रीपासून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास तपासणी नाकेही लावण्यात येणार आहेत. पोलिसांच्या १३७ जीपमधून ही गस्त घालण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक विभागानेही प्रत्येक मदान केंद्रावर चार याप्रमाणे एक हजार ५६२ केंद्रावर प्रत्येक चार कर्मचारी राहणार आहे. यासाठी सहा हजार १८८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. निवडणूक विभागाच्या १३५ बसेस आणि १३० जिप्स राहणार आहेत. गुरूवारी सायंकाळी पाच वजाता जाहीर प्रचार संपल्याने आता घरोघरी जाऊन उमेदवार प्रत्यक्ष भेटी घेणार आहे. रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवारांना जागरण करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत शेवटचे दोन दिवस अतिशय महत्वाचे मानले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)