शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील दारूबंदीचे नियोजन काय?

By admin | Updated: July 24, 2015 02:12 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे.

एक्साईज-पोलिसांपुढे आव्हान : तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटीज्ञानेश्वर मुंदे यवतमाळजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहे. प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी ‘खऱ्या’ प्रचाराला प्रारंभ झाला आहे. यातून गावागावांत वाहणारा दारूचा महापूर रोखण्याचे खरे आव्हान पोलीस व एक्साईजपुढे आहे. तर तंटामुक्त समित्या, दारूविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही कसोटी लागणार आहे. आता दारूबंदीचे नियोजन काय? असा प्रश्न विचारला जात आहे.यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह गट ग्रामपंचायतीतही प्रचाराची चुरस दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास उरले असून प्रत्येक उमेदवार जीवाचे रान करीत आहे. निवडणूक आणि दारू असे ग्रामीण भागात जुनेच समीकरण आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत याचा अनेकांना प्रत्यय आला. आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. या निवडणुकीतही गावागावात दारूचे पाट वाहणार यात शंका नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलीच ‘झिंग’ चढली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराने ‘खास’ नियोजन केले असून ‘ड्राय डे’च्या काळात अडचण जाऊ नये म्हणून जय्यत तयारी चालविली आहे. (नगर प्रतिनिधी) दीड हजार मतदान केंद्रांसाठी तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २५ जुलै रोजी होणाऱ्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून तीन हजार १८६ पोलीस तैनात करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी एक हजार ५६२ मतदान केंद्रावर ६ हजार १८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून गावागावांतील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या बोलविण्यात आल्या आहेत. तब्बल दोनशे जवान यामध्ये असून जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हजार ९४४ पोलीस शिपाई , ९०६ होमगार्ड राहणार आहेत. रात्रीपासून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास तपासणी नाकेही लावण्यात येणार आहेत. पोलिसांच्या १३७ जीपमधून ही गस्त घालण्यात येणार आहे. यासोबतच निवडणूक विभागानेही प्रत्येक मदान केंद्रावर चार याप्रमाणे एक हजार ५६२ केंद्रावर प्रत्येक चार कर्मचारी राहणार आहे. यासाठी सहा हजार १८८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. निवडणूक विभागाच्या १३५ बसेस आणि १३० जिप्स राहणार आहेत. गुरूवारी सायंकाळी पाच वजाता जाहीर प्रचार संपल्याने आता घरोघरी जाऊन उमेदवार प्रत्यक्ष भेटी घेणार आहे. रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवारांना जागरण करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत शेवटचे दोन दिवस अतिशय महत्वाचे मानले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)