शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दारव्हा येथे विहिरी ३०० अन् अर्ज अडीच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:17 IST

तालुक्यात धडक सिंचन विहिरींची सोमवारी दुपारी सोडत काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थी निवडण्यात आले.

ठळक मुद्देबचत भवनात सोडत : ५६ गावांत लक्षांक नसल्याने लाभच नाही

आॅनलाईन लोकमतदारव्हा : तालुक्यात धडक सिंचन विहिरींची सोमवारी दुपारी सोडत काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थी निवडण्यात आले. यामध्ये दोन हजार ५९७ अर्जदार शेतकºयांपैकी केवळ ३०० जणांनाच सिंचन विहिरीचा लाभ मिळाला. तालुक्यात बहुतांश गावांमध्ये लक्षांक नसल्याने येथील अर्जदार शेतकरी विहिरीपासून वंचित राहिले आहे.धडक सिंचन योजनेच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकºयांना सिंचन क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात या आर्थिक वर्षात लाभासाठी ८४ गावांतून दोन हजार ५९७ अर्ज आले होते. या अर्जातून लाभार्थी निवडण्यासाठी तालुकास्तरीय निवड समितीने स्थानिक बचत भवनात सोडत आयोजित केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय सिंचन अभियंता, तहसीलदार उपस्थित होते. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ३०० शेतकºयांना सिंचन विहीर मिळाली आहे. आता वेळेत अनुदान प्राप्त झाल्यास शेतकºयांना पावसाळ्यापूर्वी विहीर खोदून तिचे बांधकाम करता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेने पाठपुरावा करावा व कामाची गती वाढवावी, अशा सूचनाही तालुकास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आल्या. धडक सिंचन विहिरीच्या सोडतीसाठी संपूर्ण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. या परिसरात दिवसभर शेतकºयांची वर्दळ होती.विहीर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोडसिंचन विहिरीच्या माध्यमातून हिरव्या शिवाराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक शेतकºयांचा ईश्वरचिठ्ठीत लाभ न मिळाल्याने हिरमोड झाला, तर सिंचन विहीर मिळाल्याने आनंद व्यक्त करणारेही लाभार्थी येथे होते. एकंदरच बचत भवन परिसरात कभी खुशी, कभी गम असे वातावरण पाहायला मिळत होते. लक्षांक नसलेल्या गावातील स्थिती अतिशय बिकट आहे. येथील शेतकरी अजूनही सिंचन विहिरींच्या प्रतीक्षेत आहेत.