शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

विहीर बांधकामाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:11 IST

शेतकरी आत्महत्यांमागे कर्ज व नापिकीसोबतच सिंचन सुविधांचा अभाव, हे प्रमुख कारण स्पष्ट झाल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढीबाबत शासन-प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्दे अनेक सिंचन विहिरी अर्धवट स्थितीत : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्यांमागे कर्ज व नापिकीसोबतच सिंचन सुविधांचा अभाव, हे प्रमुख कारण स्पष्ट झाल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढीबाबत शासन-प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिंचन सुविधांचे मूळ असलेल्या विहिरींच्या बांधकामाचाही असाच गोंधळ पुढे आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातच विहिरींचे बांधकाम केले जात आहे. या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये कुशल खर्चाकरिता केंद्र शासनाकडून ३४५ कोटी सहा लाख ६९ हजार रुपये राज्याला प्राप्त झाले आहे. तर राज्य शासनाने त्यात १०५ कोटी दोन लाख ३६ हजार एवढ्या निधीची आपला वाटा म्हणून भर घातली. असे एकूण ४५० कोटी नऊ लाख पाच हजार रुपये राज्यात सिंचन विहिरींसाठी उपलब्ध करून देण्यात आले.शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात १३ हजार १६५ वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ सात हजार ३१३ विहिरी पूर्ण झाल्या आहे. पाच हजार ८५२ विहिरींची कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक विहिरी अर्धवट स्थितीत आहे. ५० टक्के काम पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या १२५९ तर ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या विहिरी १२५६ एवढ्या आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार व ग्रामपंचायतस्तरावर मजुुरांच्या मागणीप्रमाणे ही कामे केली जात आहे.यवतमाळ जिल्ह्यात केवळ विहिरींवर सात कोटी ८२ लाख ८४ हजार रुपयांचा निधी खर्च केला गेला आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेल्या विहिरींना आवश्यक कुशल निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून दिली जात आहे. पावणेचार हजार विहिरींसाठी निधीच शिल्लक नसल्याची व अनेक विहिरींचे काम निधीअभावी अतिशय संथगतीने सुरू असल्याची ओरड शेतकरी व राजकीय कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळते आहे.