शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

विश्वशांती रथयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:58 IST

तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्दे११ राज्यांची परिक्रमा : भगवान पार्श्वनाथांचे ४२१ फूट उंच मंदिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा देशातील ११ राज्यांची परिक्रमा पूर्ण करणार असून जगातील सर्वात उंच कृष्णगिरी तीर्थक्षेत्रावर भगवान पार्श्वनाथांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.कृष्णगिरी तीर्थामधील राष्ट्रसंत यतीवर्य डॉ. वसंत विजयजी म.सा. यांच्या मार्गदर्शनात ही विश्वशांती रथयात्रा काढण्यात आली आहे. या रथयात्रेचे सारथ्य आनंद सालच्या हे करीत आहेत. तमिळनाडूतील कृष्णगिरी तीर्थक्षेत्रावर ४२१ फुट उंच मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. या ठिकाणी ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भगवान पार्श्वनाथाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तत्पूर्वी २६ जानेवारी २०१९ ला ही विश्वशांती रथयात्रा परत तमिळनाडूत पोहोचणार आहे.या विश्वशांती रथयात्रेने आतापर्यंत तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असा प्रवास करून महाराष्ट्रात आली आहे. राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली आणि वाशिम मार्गे ही रथयात्रा यवतमाळात आली आहे. ही विश्वशांती रथयात्रा वणी-चंद्रपूर मार्गे पुढे जाणार आहे.यवतमाळात रथयात्रेचे बुधवारी थाटात स्वागत करण्यात आले. वाघापुरातील दिगंबर जैन मंदिरातून निघालेली रथयात्रा शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत केसरिया भवनात विसर्जित झाली. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. नेताजी चौकात रथयात्रेचे देव पूजन करण्यात आले. यावेळी महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रथयात्रेतील भगवान पार्श्वनाथांचे दर्शन घेतले. या रथयात्रेत छोटे आणि मोठे दोन कलश ठेवण्यात आले आहे. आचार्यांनी अभिमंत्रित केलेला १०८ तीर्थातील वासक्षेप यामध्ये ठेवण्यात आला आहे. हा कलश शहरातील बांधवांकडे नेण्यात आला. त्या ठिकाणी जाप पार पडला.जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघटनेने नेताजी चौकात रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी श्वेतांबर आणि दिगंबर जैन समाज बांधव उपस्थित होते. दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष शेखर बंड, प्रसन्न दफ्तरी, राजेंद्र खिवसरा, लहरभाई नागडा, संजय कोचर, वीरेंद्र मुथा, सचिन कोठारी, राजू जैन, भागचंद दर्डा, भवरीलाल बोरा, नंदकुमार बोरा, डॉ. रमेश खिवसरा, यग्नेश धोराजीवाला, मिनल सेठ, जित सेठ, अखिलभाई धरमसी, संदीप तातेड, विजय कोटेचा, दिलीप लोढा, विजू लोढा, कुमार नागडा, श्याम भंसाली, जैन महिला मंडळ, केसरिया महिला मंडळ, गोविंदभाई डाबरीवाल आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.