शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

वणीची नळयोजना झाली अशक्त

By admin | Updated: June 24, 2016 02:48 IST

गेल्या अनेक वर्षांत नगरपालिकेत पदाधिकारी राहिलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळेच वणीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावे लागत आहे.

पालिका पदाधिकाऱ्यांची अनास्था : ६० वर्षे जुन्या योजनेवरच पाणी पुरवठावणी : गेल्या अनेक वर्षांत नगरपालिकेत पदाधिकारी राहिलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळेच वणीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावे लागत आहे. १९५६ साली कार्यान्वित झालेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेवरच नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. ६० वर्षांपूर्वी वणी शहराची लोकसंख्या केवळ २५ हजारांच्या घरात होती. या लोकसंख्येच्या आधारावर तत्कालिन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु आज वणी शहराची लोकसंख्या अडीच पटीने वाढली आहे. पर्यायाने पाण्याचा वापर वाढला. मात्र आज अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येला पुरेशा पाण्याचा पुरवठा करणारी सशक्त योजना नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू आहे. या नळयोजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असून त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापलिकडे पालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. वणी नगरपालिकेकडून दरवर्षी नवरगाव धरणातील पाणी आरक्षित केले जाते. निर्गुडा नदीतील जलस्त्रोत आटल्यानंतर नवरगाव धरणातील पाणी घेतले जाते. त्यातून शहराला पाणी पुरवठा होतो. २००४ मध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. तत्कालिन नगराध्यक्षा शालिनी रासेकर यांच्या कार्यकाळात या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्च करून राजूर पिठवरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. मात्र तीदेखील अपयशी ठरली. कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात वणी शहरासाठी नवी नळयोजना कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न केलेत. मात्र राजकीय हेव्यादाव्यातून नगरपालिकेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींना प्रतिसादच दिला नाही. विशेष म्हणजे वर्धा नदीच्या पाण्यावर नळयोजना तयार करण्यासाठी त्यावेळी नगरपालिकेने ठरावही घेतला. मात्र ज्या ताकदीने या विषयाचा पाठपुरावा व्हायला हवा होता, तो करण्यातच न आल्याने नागरिकांना दरवर्षीच नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो (कार्यालय प्रतिनिधी)