शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वणीची नळयोजना झाली अशक्त

By admin | Updated: June 24, 2016 02:48 IST

गेल्या अनेक वर्षांत नगरपालिकेत पदाधिकारी राहिलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळेच वणीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावे लागत आहे.

पालिका पदाधिकाऱ्यांची अनास्था : ६० वर्षे जुन्या योजनेवरच पाणी पुरवठावणी : गेल्या अनेक वर्षांत नगरपालिकेत पदाधिकारी राहिलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळेच वणीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावे लागत आहे. १९५६ साली कार्यान्वित झालेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेवरच नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. ६० वर्षांपूर्वी वणी शहराची लोकसंख्या केवळ २५ हजारांच्या घरात होती. या लोकसंख्येच्या आधारावर तत्कालिन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु आज वणी शहराची लोकसंख्या अडीच पटीने वाढली आहे. पर्यायाने पाण्याचा वापर वाढला. मात्र आज अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येला पुरेशा पाण्याचा पुरवठा करणारी सशक्त योजना नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू आहे. या नळयोजनेची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असून त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापलिकडे पालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. वणी नगरपालिकेकडून दरवर्षी नवरगाव धरणातील पाणी आरक्षित केले जाते. निर्गुडा नदीतील जलस्त्रोत आटल्यानंतर नवरगाव धरणातील पाणी घेतले जाते. त्यातून शहराला पाणी पुरवठा होतो. २००४ मध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. तत्कालिन नगराध्यक्षा शालिनी रासेकर यांच्या कार्यकाळात या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्च करून राजूर पिठवरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. मात्र तीदेखील अपयशी ठरली. कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात वणी शहरासाठी नवी नळयोजना कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न केलेत. मात्र राजकीय हेव्यादाव्यातून नगरपालिकेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींना प्रतिसादच दिला नाही. विशेष म्हणजे वर्धा नदीच्या पाण्यावर नळयोजना तयार करण्यासाठी त्यावेळी नगरपालिकेने ठरावही घेतला. मात्र ज्या ताकदीने या विषयाचा पाठपुरावा व्हायला हवा होता, तो करण्यातच न आल्याने नागरिकांना दरवर्षीच नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो (कार्यालय प्रतिनिधी)