शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतात तण वाढले, मात्र मजूरच मिळेना

By admin | Updated: July 16, 2016 02:47 IST

यंदा निसर्गाची साथ दिसत असून गत काही दिवसांपासून पिकांना पोषक पाऊस कोसळत आहे.

शेतकरी त्रस्त : घरची मंडळी राबतात शेतात पुसद : यंदा निसर्गाची साथ दिसत असून गत काही दिवसांपासून पिकांना पोषक पाऊस कोसळत आहे. गत आठवड्यात तर सलग पाच दिवस पाऊस कोसळला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी पिकात वाढलेले गवत पाहून धडकी भरत आहे. काही ठिकाणी तणनाशकांचा वापर केला जात असला तरी अनेक गावत मजूरच मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरच्या मंडळींना शेतात राबण्याची वेळ आली आहे. एक काळ असा होता की शेतकरी आणि शेतमजूर एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. शेतमजुरांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत असे. एकाच शेतकऱ्याच्या घरी पिढ्यान्पिढ्या शेतमजुरी केली जात असे. त्यातूनच सालदार ही पद्धत रुढ झाली. वर्षभराचा करार करून ठराविक रक्कम व धान्य सालदाराला दिले जात होते. या बदल्यात सालदार सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शेतमालक सांगेल ती कामे करीत होता. शेतकरीसुद्धा शेतीकामासाठी सालदाराला घरच्या व्यक्तीप्रमाणे वागवत होता. शिक्षणाचा अभाव, प्रचंड गरिबी यामुळे सालाने राहणे त्या काळी गरजेचे झाले होते. परंतु आता खेडी बदलत चालली आहे. दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहे. शहरे वेगवान वाहनांमुळे जवळ आली आहे. गावागावापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपऱ्या पोहोचल्या आहे. त्यामुळे खेड्यातील माणूस आता शेतीतील निम्नदर्जाची कामे करायला तयार नाही. त्यातच शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे धान्यही यासाठी कारणीभूत ठरत आहे. सकाळी मिळालेला मजूर सायंकाळपर्यंत कामावर राहीलच याची खात्री नाही. शेतावर काम करण्याऐवजी लगतच्या शहरात जावून प्रचंड कष्टाची कामे करतील. शेतीची अनेक कामे आता यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे. मात्र निंदनासारख्या कामासाठी मजुराच्या शोधात असतो. (तालुका प्रतिनिधी)