शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

३९ लाख वृक्ष कोमेजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:02 IST

गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देमाळरान पुन्हा उजाड : वृक्ष लागवडीत संवर्धनाची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यात लावण्यात आलेले ३९ रोपटे अवघ्या दोन महिन्यातच कोमेजण्याच्या मार्गावर आहे. वृक्ष लागवड योजनेत वृक्ष संवर्धनाची सोय नसल्याने शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना कागदोपत्रीच राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.शासकीय योजना केवळ भपकेबाजपणासाठी राबविल्या जातात. योजना राबविताना येणाºया अडचणी व उपाययोजनांचा विचार होत नसल्याने त्या पूर्णत: फसतात. वन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेचीही तीच गत झाली आहे. जिल्ह्यात या योजनेत तब्बल ३९ हजार लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली. ही रोपटी सप्टेंबरमध्येच अखेरच्या घटका मोजत आहे. त्यातच पुढील पावसाळ््यात १३ कोटी रोपटी लावण्याचे नियोजन केले जात आहे.वृक्ष लागवड योजना ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशा पद्धतीने राबविली गेली. खड्डा तोच, झाड नवीन, या पद्धतीने नियोजन केले गेले. केवळ जाहिरातबाजी करून काही तरी मोठे अभियान हाती घेतल्याचे दर्शविण्यासाठी वृक्ष लागवडीचे आकडे फुगवले जात आहे. जिल्ह्याला जुलै २०१७ मध्ये २५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र येथील वनविभागाच्या यंत्रणेने त्याही पुढे एक पाऊल टाकत तब्बल २७ लाख झाडांची लागवड केली. इतर शासकीय यंत्रणांनी १२ लाख झाडे लावल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.हा पराक्रम त्यांनी केवळ जुलै महिन्यातील एका आठवड्यातच पूर्ण करीत वनमंत्र्यांचे छायाचित्र छापून गाजावाजा केला. प्रत्यक्षात ही सर्व झाडे आता कोमेजण्याच्या मार्गावर आहे.जुन्या खड्ड्यात नवीन झाडयावर्षी जिल्ह्यात केवळ ६० टक्के पाऊस झाला. यवतमाळ, राळेगाव, कळंबमध्ये सर्वात कमी पाऊस झाला. परिणामी पर्यावरण प्रेमाचा आव आणून लावलेली झाडे आता सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाकडे कोणतीच तरतूद नाही. परिणामी पुढीलवर्षी वन विभागाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जुनेच खड्डे कामात येण्याच शक्यता आहे. वनमंत्र्यांची महत्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना एकाच खड्ड्यात दरवर्षी नवीन झाड लावून पूर्णत्वास जाण्याचे संकेत यातून मिळत आहे.