शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पाणलोटची अंमलबजावणी शून्य

By admin | Updated: August 27, 2014 23:53 IST

सिंचनातून समृद्धीकडे जाण्याची स्वप्न पाहत राज्य शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला. मात्र पुसद उपविभागात या पाणलोट विकासाची अंमलबजावणी शून्य दिसत आहे.

पुसद उपविभाग : पाणी एकात्मिक नव्हे एकच ठिकाणी मुरतेअशोक काकडे - पुसद सिंचनातून समृद्धीकडे जाण्याची स्वप्न पाहत राज्य शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला. मात्र पुसद उपविभागात या पाणलोट विकासाची अंमलबजावणी शून्य दिसत आहे. कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही कामे मात्र कासवगतीने सुरू आहे. योजनेच्या पहिल्याच टप्प्यात अनियमितता होत असल्याने पाणी एकात्मिक नव्हे तर एकाच ठिकाणी मुरण्याची भीती व्यक्त होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने २००९ पासून वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. २०१२-१३ मध्ये पुसद विभागात कामांना मंजुरी मिळाली. पाच वर्षामध्ये ही कामे पूर्ण करावयाची आहे. लोकसहभागातून केल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी शासनाने भरघोस निधी मंजूर केला आहे. जल व मातीचे संधारण, कोरडवाहू शेतीला मदत, शेती उत्पादनात वाढ, स्वयंरोजगाराची संधी हा याचा प्रमुख उद्देश आहे. पाणलोट विकास कार्यक्रम सुरळीत राबविण्यासाठी पाणलोट विकास पथकाची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या उपजीविका कार्यक्रमाचे १० दिवसाचे व सामाजिक अभिसरण या विषयाचे १० दिवसांचे प्रशिक्षण तब्बल एक वर्षानंतर देण्यात आले. त्याचाच परिणाम आता अंमलबजावणीवर होत आहे. सदस्यांनाच कार्यक्रमाची रुपरेषा माहीत नाही तर अंमलबजावणी होणार कशी असा प्रश्न आहे. पुसद उपविभागात २०१२-१३ मध्ये १४ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. ६८ हजार ५५२ हेक्टर जमिनीच्या औपचारिक क्षेत्रावर कामे करावयाची आहे. त्यासाठी शासनाकडून ८३ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी तालुका कृषी अधिकारी पुसद यांच्याकडे चार व मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तीन प्रकल्प हस्तांतरित करण्यात आले. ३६ हजार हेक्टरसाठी ४४ कोटी रुपयांचे प्रकल्प मूल्य निर्धारित आहे. उमरखेड तालुका वनविभाग व कृषी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत २५, २६, २७ क्रमांकाचे तीन प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यापैकी २६ क्रमांकाचा प्रकल्प रद्द करण्यात आला. हे काम वनविभागाकडे हस्तांतरित केले असून १४ हेक्टरसाठी २० कोटी रुपयांचे मूल्य निर्धारित केले आहे. निर्धारित मूल्यानुसार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प, आराखडा तयार होणार आणि तो निधी मंजूर होणार यात तीळ मात्र शंका नाही. पुसद तालुक्यातील ४५ गावांमध्ये पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या होत्या. योजना मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला तरी उपक्रमांची अंमलबजावणी शून्य आहे. २०१०-११ अंतर्गत पुसद उपविभागात १३ कोटी रुपयांच्या कामात गैरप्रकार झाल्याचे नुकतेच उघड झाले. त्यामध्ये दहा सदस्यीय व्यवस्थापन समित्या कागदोपत्री दाखविल्या. या प्रकरणात ५० जणांवर कारवाई प्रस्तावित आहे. अशीच गत २०१२-१३ मध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पांचीही दिसत आहे.