शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठे दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:56 IST

ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा ...

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात, पाण्यात पालापाचोळा

ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा अधिक वाघांचा वावर असल्याने या अभयारण्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र वन्यजीवांच्या सोईसुविधांकडे प्रशासनाचे लक्षच नसल्याचे दिसून येते. वन्यजीवांची तहान भागावी यासाठी या अभयारण्यात ६५ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. त्यातील २२ ते २५ पाणवठे हे सौरऊर्जेवर चालतात. मात्र हे सर्वच पाणवठ्यांमध्ये कचरा साचलेला असतो. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी दूषित होत चालले आहे. दर सोमवारी हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. निदान या दिवशी तरी पाणवठ्यांची देखभाल होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पानगळती होते. झाडांचा पालापाचोळा या पाणवठ्यात पडतो. त्यामुळे पाणी दूषित होते. पाणवठ्याच्या अवतीभोवती सदाहरित झाडांची लागवड करणेही आवश्यक असते. मात्र अनेक पाणवठ्याच्या अवतीभोवती सागवानी झाडे आहेत. उन्हाळ्यात ही झाडे निष्पर्ण असतात. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी उन्हामुळे तापते. त्याच गरम पाण्यावर वन्यजीवांना आपली तहान भागवावी लागते. यासंदर्भात टिपेश्वर अभयारण्याचे आरएफओ अमर सिडाम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.१४८ चौैरस स्केअर किलोमिटरवर पांढरकवडा व घाटंजी अशा दोन तालुक्यात विस्तारलेल्या या अभयारण्यात वाघांसह सर्वच वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे दर दिवशी या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. राष्ट्रीय महामार्गापासून केवळ दिड किलोमिटर अंतरावर असलेला हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे, हे विशेष.पाणवठे असुरक्षितटिपेश्वर अभयारण्यातील अनेक पाणवठे पर्यटकांच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. के.सी.अर्थात कुडचीकुडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॉइंटवरील पाणवठ्याला कोणत्याही प्रकारचा दगडाचा बांध अथवा लाकडाचे कंपाऊंड नाही. त्यामुळे पर्यटकांची वाहने अगदी पाणवठ्यापर्यंत जातात. या पाणवठ्यावर अनेक वाघ पाणी पिण्यासाठी येतो. त्यामुळे पर्यटकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य