शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठे दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:56 IST

ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा ...

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात, पाण्यात पालापाचोळा

ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा अधिक वाघांचा वावर असल्याने या अभयारण्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र वन्यजीवांच्या सोईसुविधांकडे प्रशासनाचे लक्षच नसल्याचे दिसून येते. वन्यजीवांची तहान भागावी यासाठी या अभयारण्यात ६५ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. त्यातील २२ ते २५ पाणवठे हे सौरऊर्जेवर चालतात. मात्र हे सर्वच पाणवठ्यांमध्ये कचरा साचलेला असतो. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी दूषित होत चालले आहे. दर सोमवारी हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. निदान या दिवशी तरी पाणवठ्यांची देखभाल होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पानगळती होते. झाडांचा पालापाचोळा या पाणवठ्यात पडतो. त्यामुळे पाणी दूषित होते. पाणवठ्याच्या अवतीभोवती सदाहरित झाडांची लागवड करणेही आवश्यक असते. मात्र अनेक पाणवठ्याच्या अवतीभोवती सागवानी झाडे आहेत. उन्हाळ्यात ही झाडे निष्पर्ण असतात. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी उन्हामुळे तापते. त्याच गरम पाण्यावर वन्यजीवांना आपली तहान भागवावी लागते. यासंदर्भात टिपेश्वर अभयारण्याचे आरएफओ अमर सिडाम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.१४८ चौैरस स्केअर किलोमिटरवर पांढरकवडा व घाटंजी अशा दोन तालुक्यात विस्तारलेल्या या अभयारण्यात वाघांसह सर्वच वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे दर दिवशी या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. राष्ट्रीय महामार्गापासून केवळ दिड किलोमिटर अंतरावर असलेला हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे, हे विशेष.पाणवठे असुरक्षितटिपेश्वर अभयारण्यातील अनेक पाणवठे पर्यटकांच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. के.सी.अर्थात कुडचीकुडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॉइंटवरील पाणवठ्याला कोणत्याही प्रकारचा दगडाचा बांध अथवा लाकडाचे कंपाऊंड नाही. त्यामुळे पर्यटकांची वाहने अगदी पाणवठ्यापर्यंत जातात. या पाणवठ्यावर अनेक वाघ पाणी पिण्यासाठी येतो. त्यामुळे पर्यटकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य