शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: May 1, 2017 00:20 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.

हजारो लिटर पाणी रस्त्यावर : दिग्रस शहरात पाणीटंचाईचे उग्ररूप दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात एक दिवसाआड तेही अल्प पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे, तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पातून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या दिग्रसकरांना वाहून जाणारे पाणी पाहून संताप येत आहे. दिग्रस शहरानजीक जिल्ह्यातील सर्वात मोठा अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाहून मानोरा, वाशिम, दारव्हा आणि दिग्रस शहराला पाणीपुरवठा केला जातो. गत काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. दिग्रस शहरात होणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशी नागरिकांची मागणी असते. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पावरून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर वॉलमधून पाण्याचे कारंजे उडत आहे. या वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. शहरातील अनेकजण या वॉलमधून पाणी भरताना दिसतात. परंतु रस्त्याच्या बाजूला पाण्याचे लोट वाहताना दिसत आहे. एकीकडे दिग्रस शहरात पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय पाहण्याची वेळ दिग्रसकरांवर आली आहे. याबाबत वरिष्ठांना सूचनाही देण्यात आली आहे. परंतु गत काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. हजारो लिटर पाणी वाहून जाताना पाहून दिग्रसकरांचा संताप अनावर होत आहे. या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी आणि दिग्रसला मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) ग्रामीण भाग होरपळतोय दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. नळयोजना भारनियमनामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अरुणावती प्रकल्पात प्रचंड जलसाठा डोळ्याने पाहताना या नागरिकांना पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे.