शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: May 1, 2017 00:20 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.

हजारो लिटर पाणी रस्त्यावर : दिग्रस शहरात पाणीटंचाईचे उग्ररूप दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात एक दिवसाआड तेही अल्प पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे, तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पातून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या दिग्रसकरांना वाहून जाणारे पाणी पाहून संताप येत आहे. दिग्रस शहरानजीक जिल्ह्यातील सर्वात मोठा अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाहून मानोरा, वाशिम, दारव्हा आणि दिग्रस शहराला पाणीपुरवठा केला जातो. गत काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. दिग्रस शहरात होणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशी नागरिकांची मागणी असते. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पावरून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर वॉलमधून पाण्याचे कारंजे उडत आहे. या वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. शहरातील अनेकजण या वॉलमधून पाणी भरताना दिसतात. परंतु रस्त्याच्या बाजूला पाण्याचे लोट वाहताना दिसत आहे. एकीकडे दिग्रस शहरात पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय पाहण्याची वेळ दिग्रसकरांवर आली आहे. याबाबत वरिष्ठांना सूचनाही देण्यात आली आहे. परंतु गत काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. हजारो लिटर पाणी वाहून जाताना पाहून दिग्रसकरांचा संताप अनावर होत आहे. या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी आणि दिग्रसला मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) ग्रामीण भाग होरपळतोय दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. नळयोजना भारनियमनामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अरुणावती प्रकल्पात प्रचंड जलसाठा डोळ्याने पाहताना या नागरिकांना पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे.