शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: May 1, 2017 00:20 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.

हजारो लिटर पाणी रस्त्यावर : दिग्रस शहरात पाणीटंचाईचे उग्ररूप दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात एक दिवसाआड तेही अल्प पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे, तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पातून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या दिग्रसकरांना वाहून जाणारे पाणी पाहून संताप येत आहे. दिग्रस शहरानजीक जिल्ह्यातील सर्वात मोठा अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाहून मानोरा, वाशिम, दारव्हा आणि दिग्रस शहराला पाणीपुरवठा केला जातो. गत काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. दिग्रस शहरात होणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशी नागरिकांची मागणी असते. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पावरून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर वॉलमधून पाण्याचे कारंजे उडत आहे. या वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. शहरातील अनेकजण या वॉलमधून पाणी भरताना दिसतात. परंतु रस्त्याच्या बाजूला पाण्याचे लोट वाहताना दिसत आहे. एकीकडे दिग्रस शहरात पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय पाहण्याची वेळ दिग्रसकरांवर आली आहे. याबाबत वरिष्ठांना सूचनाही देण्यात आली आहे. परंतु गत काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. हजारो लिटर पाणी वाहून जाताना पाहून दिग्रसकरांचा संताप अनावर होत आहे. या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी आणि दिग्रसला मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) ग्रामीण भाग होरपळतोय दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. नळयोजना भारनियमनामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अरुणावती प्रकल्पात प्रचंड जलसाठा डोळ्याने पाहताना या नागरिकांना पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे.