शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अंतरगाव प्रकल्पाच्या पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:52 IST

अंतरगाव प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईपमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून ही बाब पाटबंधारे उपविभागाकडून दुर्लक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : अंतरगाव प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईपमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून ही बाब पाटबंधारे उपविभागाकडून दुर्लक्षित आहे.अंतरगाव प्रकल्पाचा डावा कालवा १९, तर उजवा कालवा सात किलोमीटर आहे. धरणाच्या वेस्टवेअरवरील नाल्यावर लोखंडी पाईप टाकून उजव्या कालव्याला पाणी सोडले जाते. या पाईपला छीद्र पडले आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून ही दुरुस्ती करण्याचे सौजन्य पाटबंधारे उपविभाग क्र.५ ने दाखविले नाही. काही वर्षांपूर्वी तुडुंब भरणारा अंतरगाव प्रकल्प मागील दोन वर्षांपासून कसाबसा ५० टक्के भरलेला दिसत आहे. सडलेल्या अवस्थेतील पाईपमधून वाहणाऱ्या पाण्याचा फायदा शेतकºयांना होत नाही. थेट नाल्यातून पाणी वाहून जाते. अनेक शेतकरी या प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबून राहून शेती करतात. कालव्याला पाणी सोडल्यास छीद्र पडलेल्या पाईपमधून पाणी वाया जाते. तसेच डाव्या कालव्याच्या अनेक ठिकाणाहून पाणी पाझरत असल्याने तेथेही दुरुस्तीची गरज आहे.