शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जलयुक्तने मिळाले सोयाबीनला जीवदान

By admin | Updated: August 27, 2016 00:44 IST

सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे.

कृषी विभाग : दारव्हा तालुक्यात ३६ गावांत ९० सिमेंट नाला बांधदारव्हा : सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावात हे अभियान या पिकासाठी संजीवनी ठरले आहे. दारव्हा तालुक्यात कृषी विभागाने एकूण ३६ गावांत सिमेंट नालाबांध खोलीकरणाची ९० कामे केली. त्यात धामणगाव (देव) येथे झालेल्या कामांचा चांगला फायदा या गावातील शेतकऱ्यांना झाल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी पावसाळा जोरदार राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडा उशीर का होईना वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. मध्यंतरीही चांगला पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात पिकांना चांगला फायदा झाला. परंतु सध्या पावसाने दडी मारली आहे. गेली दोन आठवड्यापासून पाऊस नाही. कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात आली त्याठिकाणी चांगला फायदा सोयाबीनला झाला आहे. धामणगाव (देव) येथे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला होता. या गावात नाला खोलीकरणाच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाव्दारे सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकरी बांधव यशस्वी झाले आहे. त्यामुळे धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियान सोयाबीनसाठी संजीवनी ठरल्याचे बोलले जात आहे. पाऊस नसल्याचा परिणाम सोयाबीनच्या अ‍ॅव्हरेजवर झाला आहे. मात्र धामणगावसारख्या काही गावात पाणी उपलब्ध झाल्याने त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा निश्चित झाला. ज्या गावात पाणी नाही आणि विजेचे भारनियमन वा अन्य कारणामुळे जे शेतकरी पिकाला पाणी देऊ शकले नाही, त्यांचे सोयाबीन हातचे गेले, असे शेतकरी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)