शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

जलयुक्तने मिळाले सोयाबीनला जीवदान

By admin | Updated: August 27, 2016 00:44 IST

सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे.

कृषी विभाग : दारव्हा तालुक्यात ३६ गावांत ९० सिमेंट नाला बांधदारव्हा : सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावात हे अभियान या पिकासाठी संजीवनी ठरले आहे. दारव्हा तालुक्यात कृषी विभागाने एकूण ३६ गावांत सिमेंट नालाबांध खोलीकरणाची ९० कामे केली. त्यात धामणगाव (देव) येथे झालेल्या कामांचा चांगला फायदा या गावातील शेतकऱ्यांना झाल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी पावसाळा जोरदार राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडा उशीर का होईना वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. मध्यंतरीही चांगला पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात पिकांना चांगला फायदा झाला. परंतु सध्या पावसाने दडी मारली आहे. गेली दोन आठवड्यापासून पाऊस नाही. कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात आली त्याठिकाणी चांगला फायदा सोयाबीनला झाला आहे. धामणगाव (देव) येथे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला होता. या गावात नाला खोलीकरणाच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाव्दारे सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकरी बांधव यशस्वी झाले आहे. त्यामुळे धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियान सोयाबीनसाठी संजीवनी ठरल्याचे बोलले जात आहे. पाऊस नसल्याचा परिणाम सोयाबीनच्या अ‍ॅव्हरेजवर झाला आहे. मात्र धामणगावसारख्या काही गावात पाणी उपलब्ध झाल्याने त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा निश्चित झाला. ज्या गावात पाणी नाही आणि विजेचे भारनियमन वा अन्य कारणामुळे जे शेतकरी पिकाला पाणी देऊ शकले नाही, त्यांचे सोयाबीन हातचे गेले, असे शेतकरी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)