शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

जलयुक्तने मिळाले सोयाबीनला जीवदान

By admin | Updated: August 27, 2016 00:44 IST

सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे.

कृषी विभाग : दारव्हा तालुक्यात ३६ गावांत ९० सिमेंट नाला बांधदारव्हा : सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावात हे अभियान या पिकासाठी संजीवनी ठरले आहे. दारव्हा तालुक्यात कृषी विभागाने एकूण ३६ गावांत सिमेंट नालाबांध खोलीकरणाची ९० कामे केली. त्यात धामणगाव (देव) येथे झालेल्या कामांचा चांगला फायदा या गावातील शेतकऱ्यांना झाल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी पावसाळा जोरदार राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडा उशीर का होईना वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. मध्यंतरीही चांगला पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात पिकांना चांगला फायदा झाला. परंतु सध्या पावसाने दडी मारली आहे. गेली दोन आठवड्यापासून पाऊस नाही. कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात आली त्याठिकाणी चांगला फायदा सोयाबीनला झाला आहे. धामणगाव (देव) येथे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला होता. या गावात नाला खोलीकरणाच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाव्दारे सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकरी बांधव यशस्वी झाले आहे. त्यामुळे धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियान सोयाबीनसाठी संजीवनी ठरल्याचे बोलले जात आहे. पाऊस नसल्याचा परिणाम सोयाबीनच्या अ‍ॅव्हरेजवर झाला आहे. मात्र धामणगावसारख्या काही गावात पाणी उपलब्ध झाल्याने त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा निश्चित झाला. ज्या गावात पाणी नाही आणि विजेचे भारनियमन वा अन्य कारणामुळे जे शेतकरी पिकाला पाणी देऊ शकले नाही, त्यांचे सोयाबीन हातचे गेले, असे शेतकरी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)