शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडुंब

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत

विहिरींची पातळी वाढली : मोहाडी तालुक्यातील शेतीला संजीवनी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले समाधान भंडारा : शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोहाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १५ गावांचा समावेश करण्यात आला. या गावात सर्व यंत्रणांनी मिळून शेततळे, सिमेंटनाला बांध, नाला खोलीकरण, मजगी, साठवण तलाव दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, बोडी नूतनीकरण व भातखाचरे पुनर्जीवन अशी २४३ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात पूर्ण झालेल्या कामात पाणी साठले असून याचा वापर शेतकरी धान पिकासाठी करत आहे. मोहाडी तालुक्यात या मोसमात जलयुक्त शिवारच्या कामात १७०० टिसीएम पाणीसाठा झाला असून याद्वारे १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणे अपेक्षित आहे. २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी व खैरलांजी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. मोहाडी तालुक्यात नालाबांध व शेततळे तुडूंब भरले असून विहिरीच्या पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे ३१, सिमेंट नालाबांध १९, नाला खोलीकरण ५५, सिमेंट नालाबांध दुरुस्ती १७, मजगी १८ (३५ हेक्टर), साठवण तलाव १३, बोडी नूतनीकरण ७, भातखाचरे पुनर्जीवन ८२ (१२४ हेक्टर) अशी एकूण २४३ कामे पूर्ण झाली आहेत. झालेल्या कामात १७०० टीसीएम पाणी साठले असून या पाण्यावर १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे. जलयुक्त शिवारामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले असून त्याचा वापर सिंचनासाठी होत आहे. धान रोवणीसाठी या पाण्याचा वापर केला आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला जलयुक्त शिवारच्या कामातील साठलेले पाणी धावून येत आाहे. (शहर प्रतिनिधी) मोहाडी तालुक्यात १०८ गावे असून त्यापैकी १५ गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. अडलेल्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी वापर करीत आहेत. बांध व शेततळ्यात साठलेले पाणी धानासाठी संजीवन ठरत आहे. सोबतच विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १० गावांची निवड झाली असून या ठिकाणी कामे सुरु आहेत. - आर.जे. पात्रीकर तालुका कृषी अधिकारी, मोहाडी