शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ब्लिचिंग न टाकताच पाणीपुरवठा

By admin | Updated: July 3, 2015 00:17 IST

तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहे. मात्र काही सरपंच व ग्रामसचिव उदासीन आहेत.

वणी : तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहे. मात्र काही सरपंच व ग्रामसचिव उदासीन आहेत. त्यामुळे गावातील पाण्यात ब्लिचिंग पावडर न टाकताच पाणी पुरवठा सुरू आहे. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या महिन्यात ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहे.आता पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात पाणी दूषित होऊन विविध साथरोग पसरतात. त्यामुळे शासनातर्फे पाणी शुद्धिकरणसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यात पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचींग पावडर टाकण्याचीही योजना आहे. येथील पंचायत समितीमार्फत तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींना हे ब्लिचिंग पावडर पुरविले जाते. मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही अनेक ग्रामपंचायतींनी अद्यापही पंचायत समितीतून ब्लिचिंग पावडर न नेल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळ्यात अनेक गावांतील पाणी पिण्यायोग्य नसते. ते पाणी निर्जंतुकीकरण करून व ब्लिचिंग पावडर टाकूनच शुद्ध केले जाते. नंतर तेच पाणी गावात नळाद्वारे सोडणे गरजेचे आहे. गावातील विहिरींमध्येही ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. मात्र अनेक सरपंच व ग्रामसचिव या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर अशुद्ध पाणी प्राशन करण्याची वेळ आली आहे. उन्हाळा व पावसाळ्याच्या तोंडवर विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. यामुळे विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता बळावली आहे. विहिरीत व पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याशिवाय पर्यायच नाही. परिणामी अनेक आजारांचे मूळ असेलेले दूषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.तालुक्यातील काही गावांमध्ये क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण जादा आहे. काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. क्षारयुक्त आणि फ्लोराईडयुक्त पाणी पिणे आरोग्यास धोकादायक मानले जाते. त्यामुळे त्याचे निर्जंतुकीकरण गरजेचे असते. मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांकडून मालमत्ता व पाणी कर वसूल करणारे ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या जीवावरच उठल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे मात्र गावकऱ्यांना पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पाणी प्राशन केल्यानंतर त्यात ब्लिचिंग पावडर टाकले की नाही, याचा अनुभव येतो. गेल्या सप्ताहात तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला. सर्व नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीतील पाणीही आता पिण्यायोग्य नाही. नदी, नाल्यात काडी, कचरा, मोठे वृक्ष वाढल्याने नदीतील पाणी गढूळ झाले आहे. ते पाणी नळाद्वारे सोडताना निर्जंतुकीकरण व ब्लिचिंग पावडर न टाकताच सोडले जात आहे. परिणामी काही गावांमध्ये साथ रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात येत्या २५ जुलैला ४२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासोभतच काही गावांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे अशा गावांना केवळ निवडणुकीचे वेध लागले आहे. तेथील विद्यमान पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेचे काहीही देणे-घेणे नाही. अनेक गावांतील गावपुढारी गावात केवळ निवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध घेण्यातच मग्न आहे. काही इच्छुक उमेदवार दररोज तहसीलमध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी चकरा मारत आहे. या सर्व बाबींमुळे गावात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचे कुणालाही सोयरसूतक नाही. केवळ येत्या निवडणुकीत सत्ता यावी म्हणून गावपुढारी आपापल्या पद्धतीने ‘फिल्डींग’ लावताना दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)