शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

ब्लिचिंग न टाकताच पाणीपुरवठा

By admin | Updated: July 3, 2015 00:17 IST

तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहे. मात्र काही सरपंच व ग्रामसचिव उदासीन आहेत.

वणी : तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहे. मात्र काही सरपंच व ग्रामसचिव उदासीन आहेत. त्यामुळे गावातील पाण्यात ब्लिचिंग पावडर न टाकताच पाणी पुरवठा सुरू आहे. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या महिन्यात ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहे.आता पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात पाणी दूषित होऊन विविध साथरोग पसरतात. त्यामुळे शासनातर्फे पाणी शुद्धिकरणसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यात पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचींग पावडर टाकण्याचीही योजना आहे. येथील पंचायत समितीमार्फत तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींना हे ब्लिचिंग पावडर पुरविले जाते. मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही अनेक ग्रामपंचायतींनी अद्यापही पंचायत समितीतून ब्लिचिंग पावडर न नेल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळ्यात अनेक गावांतील पाणी पिण्यायोग्य नसते. ते पाणी निर्जंतुकीकरण करून व ब्लिचिंग पावडर टाकूनच शुद्ध केले जाते. नंतर तेच पाणी गावात नळाद्वारे सोडणे गरजेचे आहे. गावातील विहिरींमध्येही ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. मात्र अनेक सरपंच व ग्रामसचिव या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर अशुद्ध पाणी प्राशन करण्याची वेळ आली आहे. उन्हाळा व पावसाळ्याच्या तोंडवर विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. यामुळे विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता बळावली आहे. विहिरीत व पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याशिवाय पर्यायच नाही. परिणामी अनेक आजारांचे मूळ असेलेले दूषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.तालुक्यातील काही गावांमध्ये क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण जादा आहे. काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. क्षारयुक्त आणि फ्लोराईडयुक्त पाणी पिणे आरोग्यास धोकादायक मानले जाते. त्यामुळे त्याचे निर्जंतुकीकरण गरजेचे असते. मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांकडून मालमत्ता व पाणी कर वसूल करणारे ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या जीवावरच उठल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे मात्र गावकऱ्यांना पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पाणी प्राशन केल्यानंतर त्यात ब्लिचिंग पावडर टाकले की नाही, याचा अनुभव येतो. गेल्या सप्ताहात तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला. सर्व नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीतील पाणीही आता पिण्यायोग्य नाही. नदी, नाल्यात काडी, कचरा, मोठे वृक्ष वाढल्याने नदीतील पाणी गढूळ झाले आहे. ते पाणी नळाद्वारे सोडताना निर्जंतुकीकरण व ब्लिचिंग पावडर न टाकताच सोडले जात आहे. परिणामी काही गावांमध्ये साथ रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात येत्या २५ जुलैला ४२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासोभतच काही गावांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे अशा गावांना केवळ निवडणुकीचे वेध लागले आहे. तेथील विद्यमान पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेचे काहीही देणे-घेणे नाही. अनेक गावांतील गावपुढारी गावात केवळ निवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध घेण्यातच मग्न आहे. काही इच्छुक उमेदवार दररोज तहसीलमध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी चकरा मारत आहे. या सर्व बाबींमुळे गावात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचे कुणालाही सोयरसूतक नाही. केवळ येत्या निवडणुकीत सत्ता यावी म्हणून गावपुढारी आपापल्या पद्धतीने ‘फिल्डींग’ लावताना दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)