शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जलस्रोतांनी तळ गाठल्याने दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 11, 2015 01:56 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे.

दिग्रस : उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे. मात्र नाईलाजाने ग्रामीण भागात तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते. आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे शासन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शासन प्रत्येक वर्षी नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधीचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे असते परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायती गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याचे कामही केले जातात. मुख्यत: ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामे सांभाळतो. परंतु तेच गावात येत नसल्याने पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्यात हमखास अशुद्ध पाणी प्यावे लागते. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा कोरडा होणे, हिवताप, थंडी वाजणे असे विविध आजार बळावतात. सध्या उन्हाचा तडाखा सुरू आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होतो. मिळेल ते पाणी अशा परिस्थितीत प्राशन केले जाते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक गावात नळ योजना असल्या तरी जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने सरळ विहिरीचे पाणी टाकीत आणि टाकीतून तेच पाणी नळाद्वारे प्रत्येकाच्या घरी जाते. या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे. या सर्वबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र ग्रामीण भागातील पाणी समस्या केवळ उन्हाळ्यातच तीव्र होते. नंतर पाऊस पडला की अधिकारीही लक्ष देत नाही.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची भीती दूषित पाण्यामुळे निर्माण होते. पाणी शुद्धीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)