शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोतांनी तळ गाठल्याने दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 11, 2015 01:56 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे.

दिग्रस : उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे. मात्र नाईलाजाने ग्रामीण भागात तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते. आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे शासन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शासन प्रत्येक वर्षी नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधीचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे असते परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायती गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याचे कामही केले जातात. मुख्यत: ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामे सांभाळतो. परंतु तेच गावात येत नसल्याने पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्यात हमखास अशुद्ध पाणी प्यावे लागते. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा कोरडा होणे, हिवताप, थंडी वाजणे असे विविध आजार बळावतात. सध्या उन्हाचा तडाखा सुरू आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होतो. मिळेल ते पाणी अशा परिस्थितीत प्राशन केले जाते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक गावात नळ योजना असल्या तरी जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने सरळ विहिरीचे पाणी टाकीत आणि टाकीतून तेच पाणी नळाद्वारे प्रत्येकाच्या घरी जाते. या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे. या सर्वबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र ग्रामीण भागातील पाणी समस्या केवळ उन्हाळ्यातच तीव्र होते. नंतर पाऊस पडला की अधिकारीही लक्ष देत नाही.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची भीती दूषित पाण्यामुळे निर्माण होते. पाणी शुद्धीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)