शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

जलस्रोतांनी तळ गाठल्याने दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 11, 2015 01:56 IST

उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे.

दिग्रस : उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे तळाला गेलेले जलस्रोत अशुद्ध झाले आहे. मात्र नाईलाजाने ग्रामीण भागात तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते. आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणारे शासन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शासन प्रत्येक वर्षी नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधीचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे असते परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायती गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याचे कामही केले जातात. मुख्यत: ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामे सांभाळतो. परंतु तेच गावात येत नसल्याने पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्यात हमखास अशुद्ध पाणी प्यावे लागते. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा कोरडा होणे, हिवताप, थंडी वाजणे असे विविध आजार बळावतात. सध्या उन्हाचा तडाखा सुरू आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होतो. मिळेल ते पाणी अशा परिस्थितीत प्राशन केले जाते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक गावात नळ योजना असल्या तरी जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने सरळ विहिरीचे पाणी टाकीत आणि टाकीतून तेच पाणी नळाद्वारे प्रत्येकाच्या घरी जाते. या विहिरींनी तळ गाठल्याने अनेक गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे. या सर्वबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र ग्रामीण भागातील पाणी समस्या केवळ उन्हाळ्यातच तीव्र होते. नंतर पाऊस पडला की अधिकारीही लक्ष देत नाही.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची भीती दूषित पाण्यामुळे निर्माण होते. पाणी शुद्धीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)