शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:05 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहिलांचा मोर्चा धडकला : नगरसेवकांचे नेतृत्व, प्राधिकरणाला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराला जीवन प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असून याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक व महिलांनी सोमवारी दुपारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.शहरात मोठ्याप्रमाणात डेंग्यूची, टायफाईडची साथ सुरू आहे. यात आणखी भर घालण्याचे काम जीवन प्राधिकरण दूषित पाणीपुरवठ्यातून करत आहे. कधी नव्हे तो यवतमाळात कॉलराची लागण झाली. डायरियाचे रुग्ण आताही वाढत आहे. जीवन प्राधिकणर चक्क मानवी आरोग्याशी खेळण्याचे काम करत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतरही नळ येत नाही. पाणीपुरवठ्याचे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प तुडूंब भरलेले असताना नियमित नळ येत नाही. कधी तरी आलेल्या नळातून हातही लावता येणार नाही, असे पाणी येत आहे. ही समस्या शहरातील सर्वच भागात आहे.दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतापलेल्या बांगरनगर, गिरीनगर, विठ्ठलवाडी, छत्रपतीनगर, अभिनव कॉलनी, संदीप टॉकीज परिसर, साईनगर, कामगारनगर, वंजारी फैल, बुटले ले-आऊट आदी परिसरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी परिसरातील नगरसेवक विशाल पावडे, उध्दवराव साबळे, कोमल कार्तिक ताजने, साधना काळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.आरोग्याशी खेळखंडोबादूषित पाणीपुरवठा करून जीवन प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. पिण्यायोग्य तर सोडाच दैनंदिन वापरायोग्य पाणी नळातून येत नाही. उन्हाळ््यापासून कोलमडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुरळीत झाले नाही. शहरात ठिकठिकाणी नळाची मुख्य पाईपलाईन लिक आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.