शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:05 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहिलांचा मोर्चा धडकला : नगरसेवकांचे नेतृत्व, प्राधिकरणाला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराला जीवन प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असून याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक व महिलांनी सोमवारी दुपारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.शहरात मोठ्याप्रमाणात डेंग्यूची, टायफाईडची साथ सुरू आहे. यात आणखी भर घालण्याचे काम जीवन प्राधिकरण दूषित पाणीपुरवठ्यातून करत आहे. कधी नव्हे तो यवतमाळात कॉलराची लागण झाली. डायरियाचे रुग्ण आताही वाढत आहे. जीवन प्राधिकणर चक्क मानवी आरोग्याशी खेळण्याचे काम करत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतरही नळ येत नाही. पाणीपुरवठ्याचे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प तुडूंब भरलेले असताना नियमित नळ येत नाही. कधी तरी आलेल्या नळातून हातही लावता येणार नाही, असे पाणी येत आहे. ही समस्या शहरातील सर्वच भागात आहे.दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतापलेल्या बांगरनगर, गिरीनगर, विठ्ठलवाडी, छत्रपतीनगर, अभिनव कॉलनी, संदीप टॉकीज परिसर, साईनगर, कामगारनगर, वंजारी फैल, बुटले ले-आऊट आदी परिसरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी परिसरातील नगरसेवक विशाल पावडे, उध्दवराव साबळे, कोमल कार्तिक ताजने, साधना काळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.आरोग्याशी खेळखंडोबादूषित पाणीपुरवठा करून जीवन प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. पिण्यायोग्य तर सोडाच दैनंदिन वापरायोग्य पाणी नळातून येत नाही. उन्हाळ््यापासून कोलमडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुरळीत झाले नाही. शहरात ठिकठिकाणी नळाची मुख्य पाईपलाईन लिक आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.