शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

४० तासांपासून पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: November 16, 2014 22:54 IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी

यवतमाळ : मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी ४८ तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्थानिक तहसील चौकातील जलवाहिनी फोनलाईनचे खोदकाम करताना शनिवारी सकाळी फुटली. यामुळे मेन लाईन, पाटीपुरा, शास्त्रीनगर, गोदाम फैल, नेहरूनगर, गांधीनगर आणि धामणगाव मार्गावरील भागाला पाणीपुरवठा झाला नाही. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या दिवशी पाणीपुरवठा झाला नसलेल्या भागाला पुन्हा दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल एवढे साठविलेले पाणी संपल्याने त्यांना हातपंपाचा आधार घ्यावा लागला. नळाची सोय असलेल्या भागातील हातपंप आणि विहिरी सुस्थितीत ठेवण्याकडे नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होते. परिणामी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागते. याचीच प्रचिती दोन दिवसांपासून नळ नसल्याने घरापासून दूर असलेल्या हातपंपावर धाव घ्यावी लागणाऱ्या लोकांना आली. शहरातील लोकांना पाण्यासाठी त्रास होत असताना प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले. नळ केव्हा सोडले जाईल याची माहिती देण्यासाठीही कुणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांविरुध्द आपला रोष व्यक्त केला. (वार्ताहर)