शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

४० तासांपासून पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: November 16, 2014 22:54 IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी

यवतमाळ : मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी ४८ तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्थानिक तहसील चौकातील जलवाहिनी फोनलाईनचे खोदकाम करताना शनिवारी सकाळी फुटली. यामुळे मेन लाईन, पाटीपुरा, शास्त्रीनगर, गोदाम फैल, नेहरूनगर, गांधीनगर आणि धामणगाव मार्गावरील भागाला पाणीपुरवठा झाला नाही. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या दिवशी पाणीपुरवठा झाला नसलेल्या भागाला पुन्हा दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल एवढे साठविलेले पाणी संपल्याने त्यांना हातपंपाचा आधार घ्यावा लागला. नळाची सोय असलेल्या भागातील हातपंप आणि विहिरी सुस्थितीत ठेवण्याकडे नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होते. परिणामी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागते. याचीच प्रचिती दोन दिवसांपासून नळ नसल्याने घरापासून दूर असलेल्या हातपंपावर धाव घ्यावी लागणाऱ्या लोकांना आली. शहरातील लोकांना पाण्यासाठी त्रास होत असताना प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले. नळ केव्हा सोडले जाईल याची माहिती देण्यासाठीही कुणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांविरुध्द आपला रोष व्यक्त केला. (वार्ताहर)