शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

घाटंजीत ५६ लाखांच्या रस्त्यावर ‘पाणी’

By admin | Updated: July 17, 2016 00:48 IST

शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. मात्र याचा विनियोग योग्यरीत्या होत नसल्याचे अनेक बाबीवरून स्पष्ट होत आहे.

कामांमध्ये घाई : कंत्राटदारावर अधिकारी, पदाधिकारी मेहरबान सुधाकर अक्कलवार घाटंजी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. मात्र याचा विनियोग योग्यरीत्या होत नसल्याचे अनेक बाबीवरून स्पष्ट होत आहे. गत पाच दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे येथे ५६ लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. विशेष म्हणजे, शहरातील हा मुख्य रस्ता आहे. कंत्राटदारांवर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मर्जी असल्यानेच लोकांच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात मागील पाच वर्षांमध्ये विकासाची विविध कामे करण्यात आली. अनेक योजनांचा लाभ शहरासाठी देण्यात आला. २० कोटी रुपयांची कामे करण्यात आली. प्रत्यक्षात ही कामे अतिशय निकृष्ट झाली आहे. गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. मात्र यासाठी कुणीही सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. शहरात रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या आदी कामे करण्यात आली आहे. यासाठी प्राप्त निधीतील ५० टक्केही रक्कम या कामांवर खर्च करण्यात आली नसावी असेच चित्र आहे. शहरातील काही कामांसंदर्भात झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा अंतर्गत या समितीने गेली १० महिन्यात काय चौकशी केली हा न उलगडणारा प्रश्न आहे. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरत असावे या शंकेला जागा मिळाली आहे. आकस्मिक निधीतून शहरात ५६ लाख रुपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. प्रचंड वर्दळीच्या या रस्त्याचे काम अतिशय घाईघाईने करण्यात आले. काम सुरू असताना कुठल्याही तज्ज्ञाने तपासणीचे सौजन्य दाखविले नाही. रस्त्याचे डांबरीकरण करताना आवश्यक तेवढे साहित्य वापरलेच गेले नाही. परिणामी पावसाच्या पाण्याने हा रस्ता उखडला. आज नगरपरिषद ते गिलाणी महाविद्यालयापर्यंत रस्त्याला तळ््याचे स्वरुप आले आहे. यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून या कामासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला कुठलीही विचारणा करण्यात आलेली नाही. रस्ता उखडल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अधिकारी व पदाधिकारी कंत्राटदारावर मेहरबान आहे. त्यामुळे चौकशी होऊन कारवाई होणार कशी हा शंकास्पद प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे.