शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत ५६ लाखांच्या रस्त्यावर ‘पाणी’

By admin | Updated: July 17, 2016 00:48 IST

शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. मात्र याचा विनियोग योग्यरीत्या होत नसल्याचे अनेक बाबीवरून स्पष्ट होत आहे.

कामांमध्ये घाई : कंत्राटदारावर अधिकारी, पदाधिकारी मेहरबान सुधाकर अक्कलवार घाटंजी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. मात्र याचा विनियोग योग्यरीत्या होत नसल्याचे अनेक बाबीवरून स्पष्ट होत आहे. गत पाच दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे येथे ५६ लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. विशेष म्हणजे, शहरातील हा मुख्य रस्ता आहे. कंत्राटदारांवर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मर्जी असल्यानेच लोकांच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात मागील पाच वर्षांमध्ये विकासाची विविध कामे करण्यात आली. अनेक योजनांचा लाभ शहरासाठी देण्यात आला. २० कोटी रुपयांची कामे करण्यात आली. प्रत्यक्षात ही कामे अतिशय निकृष्ट झाली आहे. गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. मात्र यासाठी कुणीही सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. शहरात रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या आदी कामे करण्यात आली आहे. यासाठी प्राप्त निधीतील ५० टक्केही रक्कम या कामांवर खर्च करण्यात आली नसावी असेच चित्र आहे. शहरातील काही कामांसंदर्भात झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा अंतर्गत या समितीने गेली १० महिन्यात काय चौकशी केली हा न उलगडणारा प्रश्न आहे. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरत असावे या शंकेला जागा मिळाली आहे. आकस्मिक निधीतून शहरात ५६ लाख रुपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. प्रचंड वर्दळीच्या या रस्त्याचे काम अतिशय घाईघाईने करण्यात आले. काम सुरू असताना कुठल्याही तज्ज्ञाने तपासणीचे सौजन्य दाखविले नाही. रस्त्याचे डांबरीकरण करताना आवश्यक तेवढे साहित्य वापरलेच गेले नाही. परिणामी पावसाच्या पाण्याने हा रस्ता उखडला. आज नगरपरिषद ते गिलाणी महाविद्यालयापर्यंत रस्त्याला तळ््याचे स्वरुप आले आहे. यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून या कामासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला कुठलीही विचारणा करण्यात आलेली नाही. रस्ता उखडल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अधिकारी व पदाधिकारी कंत्राटदारावर मेहरबान आहे. त्यामुळे चौकशी होऊन कारवाई होणार कशी हा शंकास्पद प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे.