शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
3
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
4
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
5
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
6
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
7
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
8
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
9
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
10
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
11
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
12
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
13
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
14
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
15
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
16
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
17
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
18
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
19
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
20
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

अधरपूस, ईसापूर, पूस धरणात पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : मागील दोन वर्षांचे पर्जन्यमान परिस्थिती पाहता यंदा पावसाने दमदार वाटचाल केली. केवळ ५२ दिवसात तालुक्यात ...

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : मागील दोन वर्षांचे पर्जन्यमान परिस्थिती पाहता यंदा पावसाने दमदार वाटचाल केली. केवळ ५२ दिवसात तालुक्यात तब्बल ३५७ मिलीमीटर पाऊस कोसळला. पीक परिस्थिती चांगली असून मजुरांच्या हातांना काम मिळाल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरात आनंदाचे वातावरण आहे.

तालुक्यातील वेणी अधरपूस धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. पुसद व उमरखेड तालुक्यातील पूस धरण आणि ईसापूर धरणातील पाणीसाठा निम्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे यंदा या तीनही तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. येत्या रब्बी हंगामासाठी ते लाभदायक ठरणार आहे. मागील वर्षीच्या पावसापेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पर्जन्यमान स्थितीवरून ही बाब दिसून येते.

यंदा मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लवकरच सुरुवात केली. यावर्षी लागवड, पेरण्यासुद्धा लवकर आटोपल्या. मधला पावसाचा खंड शेतकऱ्यांना धडकी भरवणारा ठरला. मात्र, अगदी वेळेवर पावसाने परत चांगली सुरुवात केली. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाशी दोन हात करीत बळीराजा मोठ्या हिमतीने शेती कसत आहे. मेहनती व कष्टाळू शेतकरी, शेतमजुरांना कोरोनाचा कमी प्रमाणात धोका जाणवला. त्यांची आरोग्य प्रतिकारशक्ती कमालीची दिसून आली.

बॉक्स

एकाच दिवशी ६० मि.मी. पाऊस

मागील ५० दिवसांत बुधवार, २१ जुलै रोजी सर्वाधिक ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप तालुक्यात कुठेही शेती नुकसान झाल्याची महसूल दप्तरी नोंद नाही. दरम्यान, पूस धरण भरण्याच्या स्थितीत असून वेणी अधरपूसचे गेट खुले करण्याची गुरुवारी रात्री उशिरा तयारी करण्याची तयारी सुरू आहे. वेणी अधरपूस ६० टक्के भरले आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबिलवादे यांनी केले आहे.

220721\img-20210722-wa0037.jpg

वेणी अधरपुस धरण