शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
2
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
5
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
6
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
7
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
8
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
9
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
10
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
11
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
12
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
13
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
14
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
15
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
18
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
19
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
20
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

भर पावसाळ्यातही यवतमाळात पाणीटंचाई

By admin | Updated: July 6, 2016 02:44 IST

पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला

अनियमित पाणीपुरवठा : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच, आठ दिवसानंतर येतो नळ यवतमाळ : पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील पाणीटंचाई कायम आहे. गेल्या एक महिन्यात शहरात पावसाचे दोन-तीन ठोक चांगले आले. परंतु प्रकल्प फारसे भरले नाही. आजमितीस निळोणा प्रकल्पात केवळ दहा टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे. त्यामुळे आठ दिवसातून एकदाच नळ सोडण्याची स्थिती कायम आहे. परंतु काही भागात तीन ते चार दिवसातून एकदा पाणी सोडले जात आहे. ज्या भागात तीव्र पाणीटंचाई होती, ती अद्यापही कायम आहे. शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरासह, लोहारा, पिंपळगाव, वाघापूर आदी परिसरातील अनेक भागात उन्हाळ्यासारखीच भीषण पाणीटंचाई कायम आहे. नाही म्हणायला पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांची पाण्याची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळयातएवढे पाणी आता लागत नाही. परंतु पिण्यासाठी आणि वापरासाठी लागणारे आवश्यक पाणीही मिळत नाही. यावर्षी शहरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे एक महिना पूर्वीपर्यंत नगर परिषदेचे २७ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला. परंतु आता मात्र तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता शहरातील टँकरसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात नव्यानेच समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत परिसरातील पाणीटंचाई बाबत नगर परिषद पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे यातून दिसून आले. शहरात पाणी टंचाई कायम असून आठ दिवस येणाऱ्या नळामुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. पावसाळ्यातही पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने महिला त्रस्त दिसत आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)छतावरून पडणाऱ्या पाण्याचा आधार नळ येत नाहीत, नगर परिषद टँकरने पाणीपुरवठा करण्यास तयार नाही. म्हणून आता नागरिकांनीच यावर उपाययोजना करण्याचे ठरले. पावसाला सुरूवात झाल्यावर अनेकजण आपल्या छतावरून पडणारे पाणी ड्रम व इतर साहित्यांमध्ये गोळा करतात आणि नंतर हे पाणी वापरतात. यामुळे बरीच मदत होत असल्याचे नागरिकांने सांगितले. भर पावसाळ्यातही नळ सोडले जात नाही. नगर परिषद कुणाला विचारायला तयार नाही. पिंपळगाव, लोहारा, उमरसरा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेत बोलायलाही कुणी नाही. या भागाला नेतृत्वच उरले नाही. अशावेळी तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नागरिकांना आता रेन वॉटर हार्वेस्टिंग किती महत्वाचे आहे, याची जाण व्हायला लागली आहे.