शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
2
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
3
"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!
4
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
5
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
6
अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 
7
158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...
8
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
9
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
10
Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका
11
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
12
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
13
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
14
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
15
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
16
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
17
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
18
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
19
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
20
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी

भर पावसाळ्यातही यवतमाळात पाणीटंचाई

By admin | Updated: July 6, 2016 02:44 IST

पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला

अनियमित पाणीपुरवठा : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच, आठ दिवसानंतर येतो नळ यवतमाळ : पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील पाणीटंचाई कायम आहे. गेल्या एक महिन्यात शहरात पावसाचे दोन-तीन ठोक चांगले आले. परंतु प्रकल्प फारसे भरले नाही. आजमितीस निळोणा प्रकल्पात केवळ दहा टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे. त्यामुळे आठ दिवसातून एकदाच नळ सोडण्याची स्थिती कायम आहे. परंतु काही भागात तीन ते चार दिवसातून एकदा पाणी सोडले जात आहे. ज्या भागात तीव्र पाणीटंचाई होती, ती अद्यापही कायम आहे. शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरासह, लोहारा, पिंपळगाव, वाघापूर आदी परिसरातील अनेक भागात उन्हाळ्यासारखीच भीषण पाणीटंचाई कायम आहे. नाही म्हणायला पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांची पाण्याची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळयातएवढे पाणी आता लागत नाही. परंतु पिण्यासाठी आणि वापरासाठी लागणारे आवश्यक पाणीही मिळत नाही. यावर्षी शहरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे एक महिना पूर्वीपर्यंत नगर परिषदेचे २७ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला. परंतु आता मात्र तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता शहरातील टँकरसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात नव्यानेच समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत परिसरातील पाणीटंचाई बाबत नगर परिषद पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे यातून दिसून आले. शहरात पाणी टंचाई कायम असून आठ दिवस येणाऱ्या नळामुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. पावसाळ्यातही पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने महिला त्रस्त दिसत आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)छतावरून पडणाऱ्या पाण्याचा आधार नळ येत नाहीत, नगर परिषद टँकरने पाणीपुरवठा करण्यास तयार नाही. म्हणून आता नागरिकांनीच यावर उपाययोजना करण्याचे ठरले. पावसाला सुरूवात झाल्यावर अनेकजण आपल्या छतावरून पडणारे पाणी ड्रम व इतर साहित्यांमध्ये गोळा करतात आणि नंतर हे पाणी वापरतात. यामुळे बरीच मदत होत असल्याचे नागरिकांने सांगितले. भर पावसाळ्यातही नळ सोडले जात नाही. नगर परिषद कुणाला विचारायला तयार नाही. पिंपळगाव, लोहारा, उमरसरा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेत बोलायलाही कुणी नाही. या भागाला नेतृत्वच उरले नाही. अशावेळी तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नागरिकांना आता रेन वॉटर हार्वेस्टिंग किती महत्वाचे आहे, याची जाण व्हायला लागली आहे.