शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यातही यवतमाळात पाणीटंचाई

By admin | Updated: July 6, 2016 02:44 IST

पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला

अनियमित पाणीपुरवठा : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच, आठ दिवसानंतर येतो नळ यवतमाळ : पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील पाणीटंचाई कायम आहे. गेल्या एक महिन्यात शहरात पावसाचे दोन-तीन ठोक चांगले आले. परंतु प्रकल्प फारसे भरले नाही. आजमितीस निळोणा प्रकल्पात केवळ दहा टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे. त्यामुळे आठ दिवसातून एकदाच नळ सोडण्याची स्थिती कायम आहे. परंतु काही भागात तीन ते चार दिवसातून एकदा पाणी सोडले जात आहे. ज्या भागात तीव्र पाणीटंचाई होती, ती अद्यापही कायम आहे. शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरासह, लोहारा, पिंपळगाव, वाघापूर आदी परिसरातील अनेक भागात उन्हाळ्यासारखीच भीषण पाणीटंचाई कायम आहे. नाही म्हणायला पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांची पाण्याची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळयातएवढे पाणी आता लागत नाही. परंतु पिण्यासाठी आणि वापरासाठी लागणारे आवश्यक पाणीही मिळत नाही. यावर्षी शहरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे एक महिना पूर्वीपर्यंत नगर परिषदेचे २७ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला. परंतु आता मात्र तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता शहरातील टँकरसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात नव्यानेच समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत परिसरातील पाणीटंचाई बाबत नगर परिषद पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे यातून दिसून आले. शहरात पाणी टंचाई कायम असून आठ दिवस येणाऱ्या नळामुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. पावसाळ्यातही पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने महिला त्रस्त दिसत आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)छतावरून पडणाऱ्या पाण्याचा आधार नळ येत नाहीत, नगर परिषद टँकरने पाणीपुरवठा करण्यास तयार नाही. म्हणून आता नागरिकांनीच यावर उपाययोजना करण्याचे ठरले. पावसाला सुरूवात झाल्यावर अनेकजण आपल्या छतावरून पडणारे पाणी ड्रम व इतर साहित्यांमध्ये गोळा करतात आणि नंतर हे पाणी वापरतात. यामुळे बरीच मदत होत असल्याचे नागरिकांने सांगितले. भर पावसाळ्यातही नळ सोडले जात नाही. नगर परिषद कुणाला विचारायला तयार नाही. पिंपळगाव, लोहारा, उमरसरा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेत बोलायलाही कुणी नाही. या भागाला नेतृत्वच उरले नाही. अशावेळी तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नागरिकांना आता रेन वॉटर हार्वेस्टिंग किती महत्वाचे आहे, याची जाण व्हायला लागली आहे.