शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाणीटंचाई उपायातील अपहारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:22 IST

शहरातील पाणीटंचाई उपाययोजनेच्या निविदा प्रक्रियेतील अपहारावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यापूर्वीच ‘लोकमत’ने या प्रकाराचा भंडाफोड केला होता.

ठळक मुद्देनगरपरिषद : तीन महिन्यांपूर्वीच ‘लोकमत’ने केला होता भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाणीटंचाई उपाययोजनेच्या निविदा प्रक्रियेतील अपहारावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. तीन महिन्यापूर्वीच ‘लोकमत’ने या प्रकाराचा भंडाफोड केला होता. त्यानंतर नगराध्यक्षांनी तक्रारही केली होती. परंतु कारवाई ऐवजी पाणीपुरवठा विभाग प्रमुखाला अभय देण्यात आले होते.शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यासाठी विहीर स्वच्छ करणे, टँकर आदींबाबत निविदा मागविण्यात आल्या. यातील अटी व शर्ती सोईच्या ठेवण्यात आल्या. मर्जीतील कंत्राटदारांना नेमून पाणीपुरवठा विभाग प्रमुखाने अव्वाच्या सव्वा इस्टीमेट तयार केले. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्यावेळी पालिका प्रशासन व नगरसेवकांनीही दखल घेतली नाही. टंचाई उपाययोजनेच्या कामाची चौकशी केल्यास फौजदारी कक्षेत बसतील, अशा चुका आहेत. विहिरीतील गाळ काढण्यासाठी टक्केवारी ठरवित इस्टीमेट तयार केले आहे. नवीन विहीर होईल, एवढा खर्च गाळ काढण्यावर दाखविण्यात आला. पाच फूट गाळासाठी आठ लाखांची देयके मंजुरीसाठी ठेवली. यातून पाणीटंचाई ‘कॅश’ झाल्याचे दिसून येते.येथील विभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख वणी येथून आले आहे. ते तेथे वादग्रस्त ठरले होते. त्यांचे कारनामे माहीत असतानाही त्यांच्याकडे पाणी टंचाई उपाययोजनेचा करोडो रुपयांचा व्यवहार देण्यात आला. या प्रमुखाने लेखा परीक्षकांच्या स्वत:च स्वाक्षऱ्या करून ते मुख्याधिकारी व नगराध्यक्षांपुढे ठेवल्या होत्या. हा प्रकार लक्षात येताच नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही. उलट आर्थिक लाभामुळे प्रमुखाला आणखी संधी देण्यात आली. पाणी वाटपात गोंधळ झाल्यानंतर देशमुख यांचा पदभार काढला. आता सर्वसाधारण सभेत बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती यांनी देशमुख यांच्यावर आरोप करीत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. विहिरीतील गाळ काढण्यावर कशी उधळपट्टी झाली हे सांगत त्यांनी टँकर देयके थांबविण्याचा प्रस्ताव दिला. त्याला सर्व सदस्यांनी अनुमती दिली. नगरपरिषद प्रशासन पाणी पुरवठा विभागातील गौडबंगालाची चौकशी करून दोषी विरोधात फौजदारी दाखल करण्याचे औदार्य दाखविते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मोटारपंपाचा हिशेबच नाहीपाणीटंचाईच्या काळात नगरसेवकांनी मोटारपंप विकत घेण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेकडे ठेवला होता. परंतु जाणीवपूर्वक मोटारपंप भाड्याने घेण्यात आले. दर दिवसाला दोन हजार आणि नंतर दीड हजार रुपये ठरविले. टंचाई काळात कुठे आणि किती पंप लागले याचा हिशेब सर्वसाधारण सभेत देता आला नाही. आता यावर कुणीही बोलायला तयार दिसत नाही.