शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पाणीटंचाईचे संकट गडद

By admin | Updated: April 4, 2016 05:25 IST

अपुरा पाऊस आणि वाढत्या उन्हाळामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांनी तळ गाठले आहे. परिणामी जिल्ह्यावर भीषण

यवतमाळ : अपुरा पाऊस आणि वाढत्या उन्हाळामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांनी तळ गाठले आहे. परिणामी जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाही तोकड्या ठरत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. कोट्यवधींचा कृती आराखडा तयार केला जातो. मात्र दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षी प्रशासनाच्या लेखी कागदोपत्री असलेल्या टंचाई पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच मे हीटचा तडाखा सोसावा लागत असून पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. यामुळे जलाशय व विहिरीतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून बारमाही पुरवठा करणाऱ्या विहिरीही उपस्यावर आल्या आहेत. याचा फटका सर्वाधिक ग्रामीण भागात बसत आहे. बारमाही वाहणाऱ्या पैनगंगा, अरुणावती, अडाण, वर्धा, पूस या नद्याही कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे या नदी तीरावर असलेल्या नळ योजना बंद पडल्या आहे. अनेक लघु व मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ शहराला आत्ताच तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असून निळोणा प्रकल्पानेही तळ गाठला आहे. त्यामुळे भविष्यात यवतमाळ शहरातही भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टंचाई उपाययोजनेसाठी १२ कोटी ४३ लाखांचा आराखडा तयार आहे. तब्बल ४६७ गावांसाठी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आहे. त्यापैकी २०२ विहीर अधिग्रहण कार्यवाही सुरू आहे. सध्या पाच टँकरद्वारे चार तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष नळ योजना दुरुस्ती १६०, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती २९, नव्या विंधन विहिरी ५१ अशी कामे प्रस्तावित आहे. प्रशासनानेही टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन मागील वर्षीच्या आराखड्यातील अखर्चित दोन कोटी ४४ लाख रुपये चालू वर्षात खर्च करण्यास मान्यता दिली आहे. तसा आदेशही वित्त विभागाकडे आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)४ जिल्ह्यातील पाणीटंचाईचे उग्ररुप पाहता खुद्द पालकमंत्री संजय राठोड यांनी २ एप्रिलला आढावा बैठक बोलविली होती. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य व सर्व आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र अपरिहार्य कारणाने ही बैठक स्थगित करण्यात आली. शनिवार ९ एप्रिल रोजी बैठक प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. पाणीटंचाईचा प्रश्न उग्ररुप धारण करीत असताना तातडीने उपाययोजनेची मागणी होत आहे. ही बैठक त्वरित व्हावी अशी अपेक्षा टंचाईग्रस्तांकडून होत आहे.