शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

पाणीटंचाईचे संकट गडद

By admin | Updated: January 21, 2016 02:21 IST

यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

उमरखेड : यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पैनगंगा नदीतीरावरील गावांमध्ये तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ यंदा हिवाळ्यातच आली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी नदीतीरावरील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही.उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा नदी यंदा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतीरावरील सुमारे ४० गावांमध्ये पाणीसंकट निर्माण झाले आहे. या नदीतीरावर अनेक गावच्या नळयोजना आहे. नळयोजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीतच नाही तर टाकीत पाणी कोठून येणार, असा प्रश्न पडला आहे. तसेच भारनियमनही टाकीपर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळा ठरत आहे. अशा स्थितीत नदी तीरावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नदीतीरावरील नागरिकांसारखीच स्थिती बंदी भागातीलही आहे. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. तसेच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.उमरखेड पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हा निधी नेमका कशावर खर्च होतो, हाही संशोधनाचा विषय आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रशासन एकीकडे गावात जलस्त्रोत वाढल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे तीच गावे पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातही दिसत आहे. यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ येणारा निधी कसा खर्च होतो, हे दिसून येते.उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडले तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईवर मात होवू शकते. परंतु प्रशासन अद्यापही इसापूर धरणाचे पाणी सोडायला तयार नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील काही भागातही पाणीटंचाई जाणवत आहे. जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून मार्च, एप्रिल महिन्यात काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाई निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी कोणताही पुढाकार घेताना दिसत नाही. नागरिक आंदोलनाच्या तयारीत असले तरी लोकप्रतिनिधी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. खास करून नदीतीरावरील नागरिक पाणीटंचाईने हैराण असतात. परंतु त्यांच्यासाठी कायमस्वरूपी योजना केली जात नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)