शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

दारव्हा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार

By admin | Updated: April 2, 2016 03:01 IST

शहरातील सर्व नळधारकांना शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा नियमित पुरवठा, मशीन न लावता दुसऱ्या मजल्यावर चढेल इतका नळाच्या पाण्याला फोर्स, हे गेल्या कित्येक वर्षांपासून...

सुखद वार्ता : ३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरीमुकेश इंगोले  दारव्हाशहरातील सर्व नळधारकांना शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा नियमित पुरवठा, मशीन न लावता दुसऱ्या मजल्यावर चढेल इतका नळाच्या पाण्याला फोर्स, हे गेल्या कित्येक वर्षांपासून दारव्हेकर बघत असलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. नगरपरिषदेची ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना शासनाने मंजूर केली आहे. याबाबत शासन निर्णयसुद्धा निघाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.सुजल निर्मल योजनेंतर्गत ही योजना मंजूर व्हावी याकरिता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी दोन वर्षांपासून प्रयत्नरत होते. परंतु ही योजनाच बंद झाली. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावरून पालकमंत्री संजय राठोड यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि संयुक्त प्रयत्नांना यश आले. सुवर्णजयंती नगरोत्थान योजना (राज्यस्तर) यामधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नगरपरिषदेच्या स्थापनेपासून दारव्हा शहराला मुबलक व शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. नगरपरिषदेवर अनेक पक्षांनी सत्ता गाजविली. परंतु, या शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न कुणालाही सोडविता आला नाही. पाणीपुरवठा योजनेसाठी कामे झाली नाही अशातला भाग नाही. सर्वच नगराध्यक्षांनी आपापल्या परीने त्यांच्या कार्यकाळात प्रयत्न केले. परंतु आतापर्यंत तुटकतुटक कामे झाल्याने हा प्रश्न कायमचा सुटू शकला नाही.त्यामुळे या कार्यकाळात पाणीपुरवठ्याची मोठी योजना व्हावी, अशी इच्छा उराशी बाळगून असणाऱ्या नगराध्यक्ष अशोक चिरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. शासनाच्या सुजल निर्मल योजनेकरिता ठराव घेऊन इस्टिमेट, तांत्रिक मंजुरी या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला. काँग्रेसच्या शासन काळात आमदार माणिकराव ठाकरे यांच्यामार्फत प्रयत्न झाले. त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बैठका घेतल्या. याच कार्यकाळात ५ आॅक्टोबर २०१२ ला महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत दारव्हा शहर पाणीपुरवठा योजनेतील सुधारणा कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन या कामांकरिता ६४ लाख ५१ हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यामध्ये ग्राहक सर्वेक्षण, पाणी लेखा परीक्षण, ऊर्जा लेखापरीक्षण, फ्लो मीटर बसविणे, जीआयएस मॅपिंग, हायड्रोलिक मॉडेलिंग आदी कामे करण्यात आली. या कामानंतर या योजनेच्या दुसऱ्या व महत्त्वाच्या टप्प्याकरिता प्रयत्न सुरू झाले. परंतु त्यानंतर दुर्दैवाने ही योजनाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मधल्या काळात पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाईल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर राज्य शासन भाजप-शिवसेनेचे व नगरपरिषदेवर सत्ता काँग्रेसची अशा या राजकीय विरोधाभासी परिस्थितीत योजना मंजूर होणे शक्य नाही, असे अनेकांना वाटत होते. परंतु सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून नगराध्यक्ष अशोक चिरडे व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या कामाकरिता पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यांनीसुद्धा पक्षभेद विसरून प्रयत्न सुरू केले. दोन्ही बाजूकडील हाच सामंजस्याचा निर्णय या योजनेकरिता मैलाचा दगड ठरला. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर या कामाला वेग आला. या संदर्भात मंत्रालयात अनेकदा बैठका झाल्या. त्या-त्या वेळी हजर राहून नगराध्यक्ष अशोक चिरडे व मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी प्रेझेंटेशन केले आणि २९ मार्चला शासन निर्णय निघाला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ३० कोटी २ लाख व उर्वरित नगरपरिषदेची लोकवर्गणी असे ३४ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले व त्यापोटीचा पहिला हप्ता सात कोटी ६५ लाख रुपये वितरितसुद्धा करण्यात आला. या बाबतची अधिकृत माहिती नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.