शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर इसापूर धरणातून सोडणार पैनगंगेत पाणी

By admin | Updated: April 14, 2016 02:06 IST

तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत होती.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ५० गावांचा पाणीप्रश्न सुटणारउमरखेड : तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. त्याची दखल घेत उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी पाठपुरावा केला. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी पैनगंगा नदीपात्रात नांदेडसाठी सात टीएमसी आणि उमरखेडसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे नदीकाठावरील ५५ गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे. यावर्षी पैनगंगा नदीपात्रातील पाणी पूर्णपणे आटल्याने नदी कोरडी पडली. त्यामुळे नदीकाठच्या ५५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये तिवरंग, मालखेड, झाडगाव, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा, बेलखेड, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, राजापूर, चालगणी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर, सिंदगी, सावळेश्वर, सोईट, पिंपळगाव, मुरली, परोटी, थेरडी, सोनदाबी, सहस्त्रकुंड अशा ५५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. परंतु त्याची कुणीही दखल घेतली नाही. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईसंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील भीषण पाणीटंचाईवर आमदार राजेंद्र नजरधने यांनी पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला. याचा परिणाम म्हणून इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. १२ टीएमसी पाणी नांदेड व उमरखेडला विभागून देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग नांदेडचे अभियंता यांना या बाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील नदीकाठच्या शेवटच्या गावापर्यंत नदीचे पाणी पोहोचणार असून त्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ५५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. शासनाच्या या निर्णयामुळे या ५५ गावांमधील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)