शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अखेर इसापूर धरणातून सोडणार पैनगंगेत पाणी

By admin | Updated: April 14, 2016 02:06 IST

तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत होती.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ५० गावांचा पाणीप्रश्न सुटणारउमरखेड : तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. त्याची दखल घेत उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी पाठपुरावा केला. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी पैनगंगा नदीपात्रात नांदेडसाठी सात टीएमसी आणि उमरखेडसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे नदीकाठावरील ५५ गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे. यावर्षी पैनगंगा नदीपात्रातील पाणी पूर्णपणे आटल्याने नदी कोरडी पडली. त्यामुळे नदीकाठच्या ५५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये तिवरंग, मालखेड, झाडगाव, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा, बेलखेड, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, राजापूर, चालगणी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर, सिंदगी, सावळेश्वर, सोईट, पिंपळगाव, मुरली, परोटी, थेरडी, सोनदाबी, सहस्त्रकुंड अशा ५५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. परंतु त्याची कुणीही दखल घेतली नाही. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईसंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील भीषण पाणीटंचाईवर आमदार राजेंद्र नजरधने यांनी पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला. याचा परिणाम म्हणून इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. १२ टीएमसी पाणी नांदेड व उमरखेडला विभागून देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग नांदेडचे अभियंता यांना या बाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील नदीकाठच्या शेवटच्या गावापर्यंत नदीचे पाणी पोहोचणार असून त्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ५५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. शासनाच्या या निर्णयामुळे या ५५ गावांमधील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)