शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी तहसीलमध्ये पाण्याची सोयच नाही

By admin | Updated: May 17, 2017 00:59 IST

तालुक्याच्या गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : तालुक्याच्या गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र ही व्यवस्था करण्यात आली नाही. याची आठवण देण्यासाठी तहसीलदार आर.बी. मांडेकर यांना मिनरल वॉटर पिण्यासाठी देण्यात आले. या कार्यालयात दररोज हजारो नागरिक येतात. वाढत्या उन्हामुळे तृष्णातृप्तीची गरज आहे. मात्र पाणी पिण्यासाठी नागरिकांना इतर ठिकाणचा आधार घ्यावा लागत आहे. प्रत्येकजण विकत पाणी घेवून तहान भागवू शकत नाही. त्यामुळे मनसेने तहसील कार्यालयासमोर पाणपोई सुरू केली आहे. ही व्यवस्था तहसील कार्यालयाने करणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल देशमुख, सचिन येलगंधेवार, राहुल ढोरे, संदीप गाडगे, मनोज प्रजापती आदी उपस्थित होते. तालुक्यातील समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाचे कार्यालयच स्वत: तहानलेले आहे, तर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कसा सोडविणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यालयामध्ये पाण्याची सोय करता येवू नये यामागे संबंधितांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचे यावरून दिसून येते. विविध कामे घेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.