शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुसद तालुक्यात नऊ टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे महिन्यात ३० टक्के जलसाठा होता. मात्र पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने शहराला नियमित पाणीपुरवठा केला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही.

ठळक मुद्देपारा ४६ अंशावर : संख्या रोडावली, माळपठारावर टंचाई कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराचा पारा ४६ अंशावर पोहोचल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मात्र यंदाचा उन्हाळा सुसह्य ठरला असून यावर्षी केवळ ग्रामीण भागात नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान तालुक्यात १३ टँकर सुरू होते.गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे महिन्यात ३० टक्के जलसाठा होता. मात्र पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने शहराला नियमित पाणीपुरवठा केला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. तथापि माळपठार परिसरातील फेट्रा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने परिसरात नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.यंदा कोरोनामुळे अनेक नागरिक परराज्य व परजिल्ह्यातून तालुक्यात परत आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पाण्याचा वापर वाढला. त्यातच वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे.अशा परिस्थितीतही तालुक्यात यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवली नाही. तालुक्यातील छोटे, मध्यम प्रकल्प व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा होता. तरीही यंदा दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.शहरातील बोअरही आटले नाहीयावर्षी शहरातील बोअरसुद्धा आटले नाही. शहरातील विहिरी व बोअरवेलला काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शहरात अडचण निर्माण झाली नाही. पारा ४६ अंशावर पोहोचला असतानाही पाणी पातळीत मोठी घट झाली नाही. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडू दिले नाही. परिणामी पुसदकरांना यंदा पाणी टंचाईची झळ पोहोचली नाही.

टॅग्स :Waterपाणी