शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणपोईचा धर्म झाला आता बाटली‘बंद’

By admin | Updated: March 22, 2017 00:09 IST

तहानलेल्यांची तृष्णाशांती करण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की, ठिकठिकाणी पाणपोई लावली जाते. पुसद शहरही त्याला अपवाद नाही.

विकतचे पाणी : सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज पुसद : तहानलेल्यांची तृष्णाशांती करण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की, ठिकठिकाणी पाणपोई लावली जाते. पुसद शहरही त्याला अपवाद नाही. दरवर्षी सामाजिक संघटना आणि दानशूर मंडळी पाणपोई सुरू करतात. परंतु अलिकडे पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटली‘बंद’ झाला. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात प्रत्येकाला पाण्याची गरज भासते. पुसद शहरात बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांना पाण्याची ही गरज अधिक असते. त्यामुळे उन्हाळ््याच्या दिवसात शहरात ठिकठिकाणी पानपोई लावल्या जात होत्या. कुठे रांजन तर कुठे कायमस्वरुपी पानपोया उभारल्या आहेत. यासाठी शहरातील सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्ती पुढाकारही घेतात. दरवर्षी बसस्थानकासमोर, शिवाजी चौक, सुभाष चौक, मेन लाईन, श्रीरामपूर परिसरात पाणपोई लावली जाते. यावर ग्रामीण भागातून आलेले नागरिक आपली तहान भागवितात परंतु यंदा उन्हळ््याची चाहुल लागली तरी अपवाद वगळता कुठेही पाणपोई दिसत नाही. सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर तीन पाणपोई आहेत. त्यातील कामगार संघटनेची पाणपोई कायमची बंद आहे. बसस्थानकाच्या प्लॅटफार्मजवळ असलेल्या पाणपोईचाही उपयोग नागरिक घेत नाहीत. तर तिसऱ्या पाणपोईची योग्य देखभाल दिसत नाही. शिवाजी चौक आणि मेन लाईनमध्येही अद्यापपर्यंत पाणपोई सुरू झालेली नाही. तसेच शहराच्या इतर भागातही कुठे अपवाद वगळता पाणपोई नाही. परिणामी नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. अलिकडे पाण्याचा व्यापार जोरात सुरू आहे. पाऊच आणि बाटलीबंद पाणी सहज उपलब्ध होते. दोन रुपयांच्या पाऊचपासून वीस रुपयांच्या बॉटलपर्यंत पाणी विकत घ्यावे लागते. परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकतचे पाणी घेण्याची मानसिकता नसते. त्यामुळे ही मंडळी शहरातील हॉटेल, टपरीचा आधार घेतात. परंतु त्या ठिकाणीही काही विकत घेतल्याशिवाय पाणीच मिळत नाही. अनेकदा दुकानदाराकडेच पाण्याची मागणी करावी लागते. यामुळे भर उन्हात व्याकुळ झालेले नागरिक पाण्याच्या एका घोटासाठी भटकंती करताना दिसतात. (कार्यालय चमू)