शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज तोडल्याने जलसंकट गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:25 IST

थकीत बिलासाठी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडल्याने मांगलादेवी आणि वटफळीत पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना : मांगलादेवी, वटफळीत हाहाकार

ऑनलाईन लोकमतमांगलादेवी/वटफळी : थकीत बिलासाठी पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडल्याने मांगलादेवी आणि वटफळीत पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. आधीच पाणीटंचाई, त्यात हा नवीन प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.मांगलादेवी ग्रामपंचायतीकडे विद्युत कंपनीचे १३ लाख रुपये थकीत आहे. टंचाईच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, अशी विनंती ग्रामपंचायतीने विद्युत कंपनीकडे केली. मात्र ७५ टक्के रकमेचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका विद्युत कंपनीने घेतली आहे. सर्वाधिक फटका मजूर वर्ग आणि गरिबांना बसत आहे. काही लोकांनी शेत शिवारातून विविध साधनांद्वारे पाणी आणून गरज भागविणे सुरू केले आहे. मात्र गरिबांकडे पाणी साठविण्याची किंवा आणण्याची कुठलीही सोय नाही. या गावातील लोकांकडे पाणी करापोटी लाखो रुपये थकीत असल्याचे सांगितले जाते. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. दिवसभर जंगलात चरून पाण्यासाठी गावातील हळ्यावर धावत जाणाºया जनावरांना पाण्याचा घोटही मिळत नाही.पाणीटंचाईमुळे हागणदारीमुक्त गाव योजनेचाही बोजवारा उडाला आहे. पिण्यासाठीच नाही, तर शौचालयासाठी पाणी कोठून आणायचे म्हणून ग्रामस्थांनी शौचालयाकडे पाठ फिरवित उघड्यावर जाणे सुरू केले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा फज्जा उडताना दिसत आहे. पाणी समस्येवर तत्काळ उपाय करावा, अशी मागणी आहे.वटफळीवासीयांची पायपीटवटफळी : नेर तालुक्यात येत असलेल्या वटफळी येथील पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीचे पाणी करापोटी दहा लाख रुपये थकीत आहे. वारंवार आवाहन करूनही लोकांनी रकमेचा भरणा केला नाही. परिणामी पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाचे सात ते आठ लाख रुपये थकीत राहिले. त्यामुळेच वीज तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या प्रश्नामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. आधीच या गावातील जलस्रोतांची पातळी खोल गेली आहे. आणखी आठ दिवस हिच परिस्थिती राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.सोनखास परिसरातील १७ गावे संकटातसोनखास : नेर तालुक्याच्या सोनखास परिसरातील १७ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. पाणी पुरवठा योजनांची वीज तोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हातपंप, विहिरी कोरड्या पडल्या असल्याने गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या स्रोतावरून पाणी आणावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून या भागातील नागरिक पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकीत बिलासाठी नळयोजनेची वीज तोडली. ग्रामपंचायतींकडे मोठी रक्कम थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीने रकमेचा भरणा केला नाही. विहिरी कोरड्या पडल्या, हातपंप बंद आहे. या स्थितीत नळाचे पाणी मोठा आधार होते. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडे एक ते दोन वर्षांचे पाण्याचे बील थकीत आहे. वसूली न झाल्याने विजेचे बील भरणे शक्य झाले नाही, असे ग्रामपंचायतींकडून सांगितले जाते. यावर तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी आहे.