शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

दुष्काळासाठी जलसंधारण मोट

By admin | Updated: December 23, 2014 23:13 IST

यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ

यवतमाळ : यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाच्या विविध यंत्रणेकडून अनेक वर्षांपासून डझनावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र परस्परपूरक असलेल्या या योजना समन्वयाने राबवित नसल्याने त्याचा फायदा होत नाही. आता दुष्काळी स्थितीत त्याचा सकारात्मक परिणाम घेण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ या माध्यमातून सर्वच योजनांची मोट बांधण्यात आली आहे. प्रत्येकाने समन्वायाने काम करावे, असे आदेश नागपूर येथील चीटणीस सेंटरवर झालेल्या बैठकीत देण्यात आले. दृष्काळाचा भस्मासूर आग ओकत असतानाच पाणीटंचाईची झळ ही सर्वांना होरपळून टाकाणारी आहे. यावर उपाय म्हणून सर्व शक्तीनिशी जलसंधारण करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून विविध यंत्रणेकडून जलसंधारणाच्या उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु या योजना राबविताना विशेष रस स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाने दाखविला नाही. आता आणीबाणीच्या स्थितीत मरगळ झटकून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान’ हा उतारा शोधून काढला आहे. जिल्हा परिषदेतील सिंचन विभाग, रोजगार हमी योजना, पंचायत विभागाची आदर्श ग्राम योजना, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय राबवित असलेली गतीमान पाणलोट योजना, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना, महात्मा जोतीबा फुले जल भूमी सुधार अभियान, पाणलोट विकास कार्यक्रम अशा अनेक योजना कित्येक वर्षापासून स्वतंत्ररित्या राबविण्यात येत आहे. त्यामुुळे त्याचा कोणताच परिणाम दिसत नाही, केवळ पैसा खर्च होतो. हे टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवायचे आहे. याचे नेतृत्व जिल्हाधिकारी करणार आहे. त्यांच्या अधिनस्थ कृषी विकास अधिकारी, सिंचन अभियंता, कृषी अधीक्षक विकास अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहे. ठराविक गावांची निवड करून तेथील काम पूर्ण करावे, अशाच पध्दतीने व टप्प्याटप्प्याने हे अभियान राबविले जाईल. वर्षभरात अमरावती विभागामध्ये किमान पाच हजार गावाचे उद्दिष्ट पूर्ण केले जावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीला जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह जलसंधारण, ग्रामविकास, कृषी या सर्व विभागांचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, रोहयो आयुक्त आणि विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष उपस्थित होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही बैठक झाली. यापूर्वी सोमवारी खुद्द मख्यमंत्र्यांनी नागपूर विभागाची बैठक घेऊन सूचना दिल्या. मंगळवारच्या बैठकीला त्यांना उपस्थित राहता आले नाही. ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही बैठक घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)