शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी जलसंधारण मोट

By admin | Updated: December 23, 2014 23:13 IST

यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ

यवतमाळ : यावर्षी सरासीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने अमरावती विभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाच्या विविध यंत्रणेकडून अनेक वर्षांपासून डझनावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र परस्परपूरक असलेल्या या योजना समन्वयाने राबवित नसल्याने त्याचा फायदा होत नाही. आता दुष्काळी स्थितीत त्याचा सकारात्मक परिणाम घेण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ या माध्यमातून सर्वच योजनांची मोट बांधण्यात आली आहे. प्रत्येकाने समन्वायाने काम करावे, असे आदेश नागपूर येथील चीटणीस सेंटरवर झालेल्या बैठकीत देण्यात आले. दृष्काळाचा भस्मासूर आग ओकत असतानाच पाणीटंचाईची झळ ही सर्वांना होरपळून टाकाणारी आहे. यावर उपाय म्हणून सर्व शक्तीनिशी जलसंधारण करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून विविध यंत्रणेकडून जलसंधारणाच्या उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु या योजना राबविताना विशेष रस स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाने दाखविला नाही. आता आणीबाणीच्या स्थितीत मरगळ झटकून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान’ हा उतारा शोधून काढला आहे. जिल्हा परिषदेतील सिंचन विभाग, रोजगार हमी योजना, पंचायत विभागाची आदर्श ग्राम योजना, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय राबवित असलेली गतीमान पाणलोट योजना, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना, महात्मा जोतीबा फुले जल भूमी सुधार अभियान, पाणलोट विकास कार्यक्रम अशा अनेक योजना कित्येक वर्षापासून स्वतंत्ररित्या राबविण्यात येत आहे. त्यामुुळे त्याचा कोणताच परिणाम दिसत नाही, केवळ पैसा खर्च होतो. हे टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवायचे आहे. याचे नेतृत्व जिल्हाधिकारी करणार आहे. त्यांच्या अधिनस्थ कृषी विकास अधिकारी, सिंचन अभियंता, कृषी अधीक्षक विकास अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहे. ठराविक गावांची निवड करून तेथील काम पूर्ण करावे, अशाच पध्दतीने व टप्प्याटप्प्याने हे अभियान राबविले जाईल. वर्षभरात अमरावती विभागामध्ये किमान पाच हजार गावाचे उद्दिष्ट पूर्ण केले जावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीला जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह जलसंधारण, ग्रामविकास, कृषी या सर्व विभागांचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, रोहयो आयुक्त आणि विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष उपस्थित होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही बैठक झाली. यापूर्वी सोमवारी खुद्द मख्यमंत्र्यांनी नागपूर विभागाची बैठक घेऊन सूचना दिल्या. मंगळवारच्या बैठकीला त्यांना उपस्थित राहता आले नाही. ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही बैठक घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)