शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

परतीच्या पावसाचा कहर

By admin | Updated: September 25, 2016 02:51 IST

तब्बल दीड महिना दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

तिसऱ्या दिवशी पाऊस : सोयाबीनला कोंब, मूग व उडीदाला फटकायवतमाळ : तब्बल दीड महिना दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा सोयाबीन, उडीद, मूग पिकांना फटका बसत आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याचे दिसत आहे. शनिवारी दुपारी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली.खरीप हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांनी ओलिताची सोय करून पिकांना कसेबसे जगविले. सोयाबीन, उडीद, मूग काढणीवर आला आणि नेमका याचवेळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत आठवडाभरापासून यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धडाका सुरू आहे. तीन दिवसांपासून सर्वत्र पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील वाळलेला सोयाबीन भिजत आहे. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे. काढलेला मूग आणि उडीद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरात धुव्वाधार पाऊस बरसला. पावसाचा जोर एवढा होता की पाच फुटावरीलही दिसत नव्हते. तसेच जिल्ह्यातील इतरही भागातही जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस महागाव आणि उमरखेडमध्ये कोसळला. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३ टक्के पाऊस कोसळला आहे. परतीच्या पावसाने शेतकरी चिंतेत सापडला असून आणखी काही दिवस पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (शहर वार्ताहर)अंतरगाव येथे वीज कोसळून मजूर ठारबाभूळगाव : तालुक्यातील अंतरगाव येथे वीज कोसळून मजूर ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. किसन गंगाराम वाटबुरे (६६) असे मृताचे नाव आहे. तो गावातील मधुकर राऊत यांच्या शेतात सोयाबीनमध्ये काम करीत होता. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जना होऊन वीज या शेतात कोसळली. त्यात किसन जागीच ठार झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)