शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
5
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
6
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
7
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
8
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
9
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
10
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
11
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
12
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
13
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
14
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
15
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
16
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
17
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
18
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
19
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
20
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याने नरकयातना

By admin | Updated: December 30, 2014 23:46 IST

बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे.

यवतमाळ : बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. बिल्डरांची हेकेखोरी त्यांच्या जीवावर उठली आहे. दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुचना केल्यानंतरही उपाय केले जात नाही. लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५ सह दारव्हा मार्गावर असलेल्या सदनिकांमधील पाणी रेल्वे रूळाकडे सोडून देण्यात आले आहे. लोकांच्या अगदी अंगणापर्यंत पोहोचलेले पाणी थांबविण्यासाठी सध्या तरी कुठलाही मार्ग दिसत नाही. १५ ते २० फुटाचा पसारा सांडपाण्याचा असल्याने नाल्याचे स्वरूप रेल्वे रूळ परिसराला आले आहे. या भागाला लागूनच नागरी वस्ती आहे. काही ठिकाणी तर खुल्या प्लॉटपर्यंत सोडपाणी येवून पोहोचले आहे.वॉर्ड क्र.५ मध्ये असलेल्या एका सदनिकेचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली होती. काही दिवसानंतरच बुजलेली ही पाईपलाईन या सदनिकेमधील १५० लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर प्रश्न झाली होती. त्यामुळे आता या सदनिकेचे पाणी दारव्हा मार्गावर निघणाऱ्या रेल्वे रूळाजवळ सोडून देण्यात आले आहे. त्यात जनावरे आणि डुकरांचा मुक्त संचार असतो. या भागातून जाताना नाक दाबूनच मार्ग काढावा लागतो. या सदनिकेच्या घाण पाण्यामुळे होणारा त्रास कमी होतो म्हणून की काय अमरावती मार्गाला लागून असलेल्या दोन ते तीन सदनिकांच्या सांडपाण्याचीही भर यात पडली आहे. काही दिवसानंतर या गटाराचे पाणी नागरिकांच्या अंगणात पोहोचल्यास नवल वाटू नये. ग्रामपंचायतीने यावर उपाय म्हणून संबंधित बिल्डरांना वारंवार सूचित केले. परंतु त्यांनी हात झटकले. आता पुन्हा काही नवीन सदनिका निर्माण होत आहे. त्यांच्याजवळही सांडपाणी वाहून जाण्यासाठीचा कुठलाही प्लान दिसत नाही. संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. परिणामी नागरिकिांनी स्वतंत्र व्यवस्था (शोषखड्डे) तयार केले. परंतु हा उपाय कायमस्वरूपी साथ देणारा नाही. वारंवार खड्डे उपसावे लागत असल्याने खर्चाचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत नाल्यांचे बांधकाम हाच एक मुख्य उपाय आहे. सदनिका बांधताना सांडपाण्याची काय व्यवस्था आहे याची खातरजमा केल्याशिवाय ग्रामपंचायतीने परवानगी देवू नये, असे नागरिकांचे मत आहे. परंतु कुठलाही ग्रामपंचायत या सूचनेला महत्त्व देताना दिसत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांनाच भोगावा लागतो. या समस्येत अधिक भर पडत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अलीकडे डासांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. डेंग्यूसारखे आजार फैलावत आहे. त्यामुळे हा विषय प्रशासन गांभीर्याने घेतील, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)