शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

सांडपाण्याने नरकयातना

By admin | Updated: December 30, 2014 23:46 IST

बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे.

यवतमाळ : बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. बिल्डरांची हेकेखोरी त्यांच्या जीवावर उठली आहे. दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुचना केल्यानंतरही उपाय केले जात नाही. लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५ सह दारव्हा मार्गावर असलेल्या सदनिकांमधील पाणी रेल्वे रूळाकडे सोडून देण्यात आले आहे. लोकांच्या अगदी अंगणापर्यंत पोहोचलेले पाणी थांबविण्यासाठी सध्या तरी कुठलाही मार्ग दिसत नाही. १५ ते २० फुटाचा पसारा सांडपाण्याचा असल्याने नाल्याचे स्वरूप रेल्वे रूळ परिसराला आले आहे. या भागाला लागूनच नागरी वस्ती आहे. काही ठिकाणी तर खुल्या प्लॉटपर्यंत सोडपाणी येवून पोहोचले आहे.वॉर्ड क्र.५ मध्ये असलेल्या एका सदनिकेचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली होती. काही दिवसानंतरच बुजलेली ही पाईपलाईन या सदनिकेमधील १५० लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर प्रश्न झाली होती. त्यामुळे आता या सदनिकेचे पाणी दारव्हा मार्गावर निघणाऱ्या रेल्वे रूळाजवळ सोडून देण्यात आले आहे. त्यात जनावरे आणि डुकरांचा मुक्त संचार असतो. या भागातून जाताना नाक दाबूनच मार्ग काढावा लागतो. या सदनिकेच्या घाण पाण्यामुळे होणारा त्रास कमी होतो म्हणून की काय अमरावती मार्गाला लागून असलेल्या दोन ते तीन सदनिकांच्या सांडपाण्याचीही भर यात पडली आहे. काही दिवसानंतर या गटाराचे पाणी नागरिकांच्या अंगणात पोहोचल्यास नवल वाटू नये. ग्रामपंचायतीने यावर उपाय म्हणून संबंधित बिल्डरांना वारंवार सूचित केले. परंतु त्यांनी हात झटकले. आता पुन्हा काही नवीन सदनिका निर्माण होत आहे. त्यांच्याजवळही सांडपाणी वाहून जाण्यासाठीचा कुठलाही प्लान दिसत नाही. संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. परिणामी नागरिकिांनी स्वतंत्र व्यवस्था (शोषखड्डे) तयार केले. परंतु हा उपाय कायमस्वरूपी साथ देणारा नाही. वारंवार खड्डे उपसावे लागत असल्याने खर्चाचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत नाल्यांचे बांधकाम हाच एक मुख्य उपाय आहे. सदनिका बांधताना सांडपाण्याची काय व्यवस्था आहे याची खातरजमा केल्याशिवाय ग्रामपंचायतीने परवानगी देवू नये, असे नागरिकांचे मत आहे. परंतु कुठलाही ग्रामपंचायत या सूचनेला महत्त्व देताना दिसत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांनाच भोगावा लागतो. या समस्येत अधिक भर पडत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अलीकडे डासांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. डेंग्यूसारखे आजार फैलावत आहे. त्यामुळे हा विषय प्रशासन गांभीर्याने घेतील, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)