शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

सांडपाण्याने नरकयातना

By admin | Updated: December 30, 2014 23:46 IST

बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे.

यवतमाळ : बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. बिल्डरांची हेकेखोरी त्यांच्या जीवावर उठली आहे. दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुचना केल्यानंतरही उपाय केले जात नाही. लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५ सह दारव्हा मार्गावर असलेल्या सदनिकांमधील पाणी रेल्वे रूळाकडे सोडून देण्यात आले आहे. लोकांच्या अगदी अंगणापर्यंत पोहोचलेले पाणी थांबविण्यासाठी सध्या तरी कुठलाही मार्ग दिसत नाही. १५ ते २० फुटाचा पसारा सांडपाण्याचा असल्याने नाल्याचे स्वरूप रेल्वे रूळ परिसराला आले आहे. या भागाला लागूनच नागरी वस्ती आहे. काही ठिकाणी तर खुल्या प्लॉटपर्यंत सोडपाणी येवून पोहोचले आहे.वॉर्ड क्र.५ मध्ये असलेल्या एका सदनिकेचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली होती. काही दिवसानंतरच बुजलेली ही पाईपलाईन या सदनिकेमधील १५० लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर प्रश्न झाली होती. त्यामुळे आता या सदनिकेचे पाणी दारव्हा मार्गावर निघणाऱ्या रेल्वे रूळाजवळ सोडून देण्यात आले आहे. त्यात जनावरे आणि डुकरांचा मुक्त संचार असतो. या भागातून जाताना नाक दाबूनच मार्ग काढावा लागतो. या सदनिकेच्या घाण पाण्यामुळे होणारा त्रास कमी होतो म्हणून की काय अमरावती मार्गाला लागून असलेल्या दोन ते तीन सदनिकांच्या सांडपाण्याचीही भर यात पडली आहे. काही दिवसानंतर या गटाराचे पाणी नागरिकांच्या अंगणात पोहोचल्यास नवल वाटू नये. ग्रामपंचायतीने यावर उपाय म्हणून संबंधित बिल्डरांना वारंवार सूचित केले. परंतु त्यांनी हात झटकले. आता पुन्हा काही नवीन सदनिका निर्माण होत आहे. त्यांच्याजवळही सांडपाणी वाहून जाण्यासाठीचा कुठलाही प्लान दिसत नाही. संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या नवीन वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. परिणामी नागरिकिांनी स्वतंत्र व्यवस्था (शोषखड्डे) तयार केले. परंतु हा उपाय कायमस्वरूपी साथ देणारा नाही. वारंवार खड्डे उपसावे लागत असल्याने खर्चाचा भार वाढत आहे. अशा परिस्थितीत नाल्यांचे बांधकाम हाच एक मुख्य उपाय आहे. सदनिका बांधताना सांडपाण्याची काय व्यवस्था आहे याची खातरजमा केल्याशिवाय ग्रामपंचायतीने परवानगी देवू नये, असे नागरिकांचे मत आहे. परंतु कुठलाही ग्रामपंचायत या सूचनेला महत्त्व देताना दिसत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांनाच भोगावा लागतो. या समस्येत अधिक भर पडत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अलीकडे डासांच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. डेंग्यूसारखे आजार फैलावत आहे. त्यामुळे हा विषय प्रशासन गांभीर्याने घेतील, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)