शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अरुणावती काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

फोटो दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच ...

फोटो

दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी नऊ गेटमधून प्रति सेकंद ३७० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, दोन दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने, रविवारी सकाळी १० नंतर चार दरवाजे बंद करण्यात आले. आता पाच दरवाज्यांतून ११५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

अद्याप पाण्याची आवक सुरूच असल्याने, पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरणात आणखी पाणी वाढण्याची शक्यता गृहित धरून धरणाच्या जवळपासच्या सर्वच गावांतील नागरिकांना अरुणावती प्रकल्प विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणी सोडल्यास धरण पात्रात अथवा धरणाच्या पुढील भागात मासेमारी करण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता सागर आलाटकर यांनी केले आहे.