शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

वर्धा नदीचे खोरे झाले विषाक्त

By admin | Updated: June 8, 2017 01:24 IST

पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवत वेकोलिने तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या तिरावर मातीचे ढिगारे उभे केले.

पात्र झाले अरुंद : वेकोलिचे ढिगारे नदीच्या मुळावर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवत वेकोलिने तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या तिरावर मातीचे ढिगारे उभे केले. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून खाणीतून निघणारे रसायनयुक्त पाणीदेखील थेट नदीत सोडले जात आहे, परिणामी वर्धा नदीचे खोरे विषाक्त झाले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाला याकडे लक्ष देत नाही. नदीपात्रापासून ३०० मिटर लांब अंतरावर हे ढिगारे टाकणे गरजेचे होते. मात्र नियमाला तिलांजली देत वेकोलिच्या मुंगोली खाणीतून निघालेल्या मातीचे ढिगारे कोलेरा ते अहेरी गावापर्यंत वर्धा नदीच्या काठावर टाकण्यात आले आहेत. या परिसरात पहाडा एवढे मातीचे ढिगारे उभे आहेत. या ढिगाऱ्यांनी अनेक ठिकाणी नदीचे पात्रच गिळंकृत केले आहे. त्यामुळे नदीचा जवळपास ३० टक्के भाग मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे. कोणत्याही नैैसर्गिक जलस्त्रोताला छेडछाड करता येत नाही. असे असतानाही वेकोलिने मनमानी करीत नदीच्या काठावर मातीचे ढिगारे उभे केले आहेत. मुंगोली व घुग्घूस कोळसा खाणीमुळे वर्धा नदीचे खोरे विषाक्त झाले आहे. पर्यावरण मंत्रालयाने मातीचे ढिगारे टाकण्यासाठीही काही नियम घालून दिले आहेत. ४० मिटर उंचीपेक्षा अधिक उंचीचे मातीचे ढिगारे उभे करता येत नाही. परंतु वेकोलिने या नियमालाही हरताळ फासला आहे. वेकोलिच्या खाणींमधून मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त पाणी निघते. नियमानुसार या पाण्यावर प्रक्रीया केल्यानंतरच ते नदीत सोडले जावे, असाही नियम आहे. परंतु वेकोलिचा ईटीपी प्लँट (इंडस्ट्रीयल ट्रीटमेन्ट प्लँट) सशक्त नसल्याने अनेकदा प्रक्रीया न करताच हे पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र प्रदूषित होत आहे. या नदीच्या पाण्याने सिंचन केले. जाते. रसायनयुक्त पाण्याने जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पीक उत्पादनावरही परिणाम होत असल्याच्या नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पुराचा धोका वकोलिच्या ढिगाऱ्यामुळे नदीचे नैैसर्गिक पात्र अरुंद झाल्याने चांगला पाऊस झाल्यास नदीच्या पुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसून मोठे नुकसान सोसावे लागले होते. यंदाही पूर परिस्थिती निर्माण झाल्यास मुंगोली कोळसा खाणीलगतच्या कोलेरा, पिंपरी, रांगणा भुरकी, उकणी जुनाडा पिंपळगाव आदी गावांना बसतो.