शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

निधीअभावी वर्धा बॅरेज प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:53 IST

तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती.

ठळक मुद्दे७२ कोटींची मागणी : मिळाले केवळ आठ कोटी

आरिफ अली ।ऑनलाईन लोकमतबाभूळगाव : तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये प्राप्त झाल्याने या प्रकल्पाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना सिंचन सुविधा देण्यासाठी मुबारकपूरनजीक वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील परसोडी, घारफळ, सिंदी, रेणुकापूर, वलिदापूर, पाचखेड, येरंडगाव, वडगाव, हादगाव, मुबारकपूर, राऊत सावंगी, गोंधळी, किन्ही, सारफळी, वाटखेड (बु), सरूळ आणि खर्डा या १७ गावातील पाच हजार ६६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात कॅनलद्वारे तीन हजार ६८ हेक्टर तर ठिबक सिंचनाद्वारे दोन हजार ५९५ हेक्टर जमिनीचे ओलित होणार आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. कंत्राटदाराचे अद्याप ३० कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहे. यावर्षी या प्रकल्पासाठी ७५ कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये मिळाल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.तालुक्यातील १७ गावातील जमीन या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र शासन दरवर्षी तोकडा निधी देत असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. परिणामी १७ गावातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. थकीत देयकापोटी या आधीसुद्धा कंत्राटदाराने काम बंद केले होते. आताही तोकडा निधी मिळाल्याने कंत्राटदार गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.शासनाचे विदर्भाकडे कायम दुर्लक्षशेतकºयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील जवळपास सर्वच प्रकल्पाला तोकडा निधी मिळत आहे. यातून कंत्राटदाराचे देयक देणेही कठीण झाले आहे. परिणामी कंत्राटदार काम सोडण्याच्या स्थितीत आले आहे. प्रस्तूत प्रतिनिधी यासंदर्भात मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली असता त्यांनी यावर्षी वर्धा बॅरेज प्रकल्पासाठी केवळ आठ कोटींची तरतूद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र पुढील वर्षी या बॅरेजमध्ये पाणी अडविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.