शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी वर्धा बॅरेज प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:53 IST

तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती.

ठळक मुद्दे७२ कोटींची मागणी : मिळाले केवळ आठ कोटी

आरिफ अली ।ऑनलाईन लोकमतबाभूळगाव : तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये प्राप्त झाल्याने या प्रकल्पाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना सिंचन सुविधा देण्यासाठी मुबारकपूरनजीक वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील परसोडी, घारफळ, सिंदी, रेणुकापूर, वलिदापूर, पाचखेड, येरंडगाव, वडगाव, हादगाव, मुबारकपूर, राऊत सावंगी, गोंधळी, किन्ही, सारफळी, वाटखेड (बु), सरूळ आणि खर्डा या १७ गावातील पाच हजार ६६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात कॅनलद्वारे तीन हजार ६८ हेक्टर तर ठिबक सिंचनाद्वारे दोन हजार ५९५ हेक्टर जमिनीचे ओलित होणार आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. कंत्राटदाराचे अद्याप ३० कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहे. यावर्षी या प्रकल्पासाठी ७५ कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये मिळाल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.तालुक्यातील १७ गावातील जमीन या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र शासन दरवर्षी तोकडा निधी देत असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. परिणामी १७ गावातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. थकीत देयकापोटी या आधीसुद्धा कंत्राटदाराने काम बंद केले होते. आताही तोकडा निधी मिळाल्याने कंत्राटदार गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.शासनाचे विदर्भाकडे कायम दुर्लक्षशेतकºयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील जवळपास सर्वच प्रकल्पाला तोकडा निधी मिळत आहे. यातून कंत्राटदाराचे देयक देणेही कठीण झाले आहे. परिणामी कंत्राटदार काम सोडण्याच्या स्थितीत आले आहे. प्रस्तूत प्रतिनिधी यासंदर्भात मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली असता त्यांनी यावर्षी वर्धा बॅरेज प्रकल्पासाठी केवळ आठ कोटींची तरतूद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र पुढील वर्षी या बॅरेजमध्ये पाणी अडविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.