शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निधीअभावी वर्धा बॅरेज प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:53 IST

तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती.

ठळक मुद्दे७२ कोटींची मागणी : मिळाले केवळ आठ कोटी

आरिफ अली ।ऑनलाईन लोकमतबाभूळगाव : तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये प्राप्त झाल्याने या प्रकल्पाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना सिंचन सुविधा देण्यासाठी मुबारकपूरनजीक वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील परसोडी, घारफळ, सिंदी, रेणुकापूर, वलिदापूर, पाचखेड, येरंडगाव, वडगाव, हादगाव, मुबारकपूर, राऊत सावंगी, गोंधळी, किन्ही, सारफळी, वाटखेड (बु), सरूळ आणि खर्डा या १७ गावातील पाच हजार ६६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात कॅनलद्वारे तीन हजार ६८ हेक्टर तर ठिबक सिंचनाद्वारे दोन हजार ५९५ हेक्टर जमिनीचे ओलित होणार आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. कंत्राटदाराचे अद्याप ३० कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहे. यावर्षी या प्रकल्पासाठी ७५ कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये मिळाल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.तालुक्यातील १७ गावातील जमीन या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र शासन दरवर्षी तोकडा निधी देत असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. परिणामी १७ गावातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. थकीत देयकापोटी या आधीसुद्धा कंत्राटदाराने काम बंद केले होते. आताही तोकडा निधी मिळाल्याने कंत्राटदार गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.शासनाचे विदर्भाकडे कायम दुर्लक्षशेतकºयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील जवळपास सर्वच प्रकल्पाला तोकडा निधी मिळत आहे. यातून कंत्राटदाराचे देयक देणेही कठीण झाले आहे. परिणामी कंत्राटदार काम सोडण्याच्या स्थितीत आले आहे. प्रस्तूत प्रतिनिधी यासंदर्भात मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली असता त्यांनी यावर्षी वर्धा बॅरेज प्रकल्पासाठी केवळ आठ कोटींची तरतूद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र पुढील वर्षी या बॅरेजमध्ये पाणी अडविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.