शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वणी, मारेगावला वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 4, 2015 02:12 IST

वणीसह मारेगाव तालुक्याला मंगळवारी रात्री वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सुमारे तीन तास रोहिणी बरसल्या.

वीज गुल : तीन तास बरसल्या रोहिणी, शेतकऱ्यांची धावपळ सुरू, आता सर्व लक्ष लागले मृगधारांकडे वणी : वणीसह मारेगाव तालुक्याला मंगळवारी रात्री वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सुमारे तीन तास रोहिणी बरसल्या. पहिल्याच पावसाने वातावरणातील सर्व उकाडा नाहिसा केला. शेतकऱ्यांनीही आता पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ केला आहे.गेल्या २५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरूवात झाली. त्यानंतर २६ मे रोजी पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पारा भडकला होता. गेले पाच दिवस वातावरणात भयंकर उकाडा जाणवत होता. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मंगळवारी सकाळापासून उन्ह तापले होते. या उन्हामुळे सर्वच घायाकुतीस आले होते. मात्र सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ७ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाला एकदा सुरूवात झाल्यानंतर तब्बल तीन तास पाऊस कोसळत होता. यावेळी वादळी वाराही सुटला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीजही गुल झाली होती. मात्र काही वेळानंतर ती परतली. तथापि पाऊस रात्री १0 वाजतापर्यंत सुरूच होता. त्यानंतर पुन्हा वीज गुल झाली. येथील २२0 के.व्ही.उपकेंद्रात बिघाड झाल्याने शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अखेर महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने रात्री १२ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश प्राप्त केले. वादळासह पाऊस कोसळत असताना विजांचा प्रचंड कडकडाट सुरूच होता. विजांच्या कडकडाटाने नागरिक भयभीत झाले होते. क्षणार्धात वीज चमकून मोठा कडकडाट कानी ऐकू येत होता. लालगुडा परिशरहतील एका झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला होता. यावेळी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने बालक तर अत्यंत भयभीत झाले होते. या वादळी पावसाचा तडाखा वणी तालुक्यात सर्वदूर बसला. शिरपूर, शिंदोला, पुनवट, नांदेपेरा, राजूर कॉलरी, घोन्सा, चिखलगाव आदी सर्वच ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला. या वादळी वाऱ्यामुळे वणी ते घोन्सा मार्गावरील मोहोर्लीजवळ एक झाड उन्मळून रस्त्यावर आडवे पडले होते. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली. या मार्गाने दुचाकीने प्रवास करणाऱ्या काही युवकांनीच ते झाड मोहोर्ली गावातील युवकांच्या सहाय्याने बाजूला केले. तोपर्यंत वणी ते घोन्सा-झरी मार्गावरील एस.टी. बसही पलीकडेच थांबून होती. नंतर मात्र या मार्गावरील वाहतूक मध्यरात्री १२ वाजतानंतर सुरळीत सुरू झाली. पहिल्याच पावसाने जोरदार दणका दिल्याने दोनही तालुक्यातील नागरिक चांगलेच घाबरले होते. पाऊस थांबल्यानंतरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. (कार्यालय प्रतिनिधी)