शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

सातबारासाठी शेतकऱ्यांची तलाठ्यांमागे भटकंती

By admin | Updated: April 13, 2017 00:54 IST

यावर्षी १५ एप्रिलपासूनच पीक कर्जाचे वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांची या कर्जासाठी लागणाऱ्या सातबाराची

सेतू केंद्रातून वाटप बंदचा परिणाम : पीक कर्ज वाटप प्रभावित होण्याची भीती यवतमाळ : यावर्षी १५ एप्रिलपासूनच पीक कर्जाचे वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांची या कर्जासाठी लागणाऱ्या सातबाराची जुळवाजुळव करण्याकरिता लगबग सुरू आहे. पूर्वी हा सातबारा सेतू केंद्रातून दिला जात होता. मात्र ४ रुपये जास्त घेत असल्याचा ठपका ठेऊन सेतू केंद्रातून हे काम काढून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सातबारासाठी तलाठ्याच्या मागे फिरावे लागते. आर्थिक भुर्दंड मात्र पूर्वीसारखाच कायम असल्याचे सांगितले जाते. लगतच्या वर्धा जिल्ह्यात ई-डिस्ट्रीक्टचे काम जोरात सुरू आहे. तेथे अद्ययावत सातबारा मिळतो आहे. यवतमाळ जिल्ह्यात या प्रकल्पाचे संपूर्ण काम अद्याप सुरू झालेले नाही. वर्धेत तीन महिन्यांपासून अद्ययावत सातबारा दिला जात असताना यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून मात्र ९० टक्के काम पूर्ण झाले, लवकरच अद्ययावत सातबारा मिळणार एवढेच उत्तर वारंवार दिले जात आहे. पूर्वी जिल्ह्यातील सुमारे २२० सेतू केंद्रातून सातबाराचे वितरण केले जात होते. तीन गावामिळून एक सेतू केंद्र देण्यात आले होते. तेथे सातबारासाठी २३ रुपये व ८/३ साठी २३ रुपये असे ४६ रुपये घेतले जात होते. मात्र सेतू केंद्रात ५० ची नोट दिल्यानंतर ४ रुपये परत मिळत नाहीत, सातबारा ५० रुपयात पडतो, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. म्हणून जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्राकडील हे काम काढून घेऊन थेट तलाठ्याकडे दिले. मात्र तेथेही आर्थिक भुर्दंड तेवढाच आणि त्रास अधिक होत असल्याचा शेतकरी वर्गातील सूर आहे. पीक कर्जासाठी सातबारा आवश्यक आहे. त्यामुळे हा सातबारा मिळविण्याची शेतकऱ्यांची धडपड आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे येरझारा माराव्या लागत आहे. कोतवालाच्या मागे ५० रुपये घेऊन फिरुनही वेळेत सातबारा मिळत नसल्याची ओरड आहे. इकडे सेतू केंद्रावरसुद्धा सातबारा मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा आग्रह आहे. तेथे वाद निर्माण होत आहे. सेतू केंद्रावरुन पेरे पत्रक मिळाले तरी ते खातरजमा करण्यासाठी तलाठ्याकडे पाठविले जात असल्याने आणि तेथे विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खरी नाराजी आहे. (प्रतिनिधी)