शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

सातबारासाठी शेतकऱ्यांची तलाठ्यांमागे भटकंती

By admin | Updated: April 13, 2017 00:54 IST

यावर्षी १५ एप्रिलपासूनच पीक कर्जाचे वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांची या कर्जासाठी लागणाऱ्या सातबाराची

सेतू केंद्रातून वाटप बंदचा परिणाम : पीक कर्ज वाटप प्रभावित होण्याची भीती यवतमाळ : यावर्षी १५ एप्रिलपासूनच पीक कर्जाचे वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांची या कर्जासाठी लागणाऱ्या सातबाराची जुळवाजुळव करण्याकरिता लगबग सुरू आहे. पूर्वी हा सातबारा सेतू केंद्रातून दिला जात होता. मात्र ४ रुपये जास्त घेत असल्याचा ठपका ठेऊन सेतू केंद्रातून हे काम काढून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सातबारासाठी तलाठ्याच्या मागे फिरावे लागते. आर्थिक भुर्दंड मात्र पूर्वीसारखाच कायम असल्याचे सांगितले जाते. लगतच्या वर्धा जिल्ह्यात ई-डिस्ट्रीक्टचे काम जोरात सुरू आहे. तेथे अद्ययावत सातबारा मिळतो आहे. यवतमाळ जिल्ह्यात या प्रकल्पाचे संपूर्ण काम अद्याप सुरू झालेले नाही. वर्धेत तीन महिन्यांपासून अद्ययावत सातबारा दिला जात असताना यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून मात्र ९० टक्के काम पूर्ण झाले, लवकरच अद्ययावत सातबारा मिळणार एवढेच उत्तर वारंवार दिले जात आहे. पूर्वी जिल्ह्यातील सुमारे २२० सेतू केंद्रातून सातबाराचे वितरण केले जात होते. तीन गावामिळून एक सेतू केंद्र देण्यात आले होते. तेथे सातबारासाठी २३ रुपये व ८/३ साठी २३ रुपये असे ४६ रुपये घेतले जात होते. मात्र सेतू केंद्रात ५० ची नोट दिल्यानंतर ४ रुपये परत मिळत नाहीत, सातबारा ५० रुपयात पडतो, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. म्हणून जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्राकडील हे काम काढून घेऊन थेट तलाठ्याकडे दिले. मात्र तेथेही आर्थिक भुर्दंड तेवढाच आणि त्रास अधिक होत असल्याचा शेतकरी वर्गातील सूर आहे. पीक कर्जासाठी सातबारा आवश्यक आहे. त्यामुळे हा सातबारा मिळविण्याची शेतकऱ्यांची धडपड आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे येरझारा माराव्या लागत आहे. कोतवालाच्या मागे ५० रुपये घेऊन फिरुनही वेळेत सातबारा मिळत नसल्याची ओरड आहे. इकडे सेतू केंद्रावरसुद्धा सातबारा मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा आग्रह आहे. तेथे वाद निर्माण होत आहे. सेतू केंद्रावरुन पेरे पत्रक मिळाले तरी ते खातरजमा करण्यासाठी तलाठ्याकडे पाठविले जात असल्याने आणि तेथे विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खरी नाराजी आहे. (प्रतिनिधी)