शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आता बोलतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंती

By admin | Updated: February 4, 2016 02:33 IST

जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

चित्रकारांसाठी खुली स्पर्धा : चेतना अभियानात चित्ररुपाने जनजागृती, शेतकऱ्यांना प्रेरणादायी चित्रांचा समावेशयवतमाळ : जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असे चित्र, पेंटीग्स काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातील चित्रकार, शाळा, महाविदयालयीतील विदयाथ्यांनी स्वयंत्स्फूर्तीने अशी चित्र रेखाटावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे मुख्य कार्यालय असल्याने येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहेच, परंतु हेच जर परिणामकारक अशा चित्रांमधून दाखविल्यास शेतकऱ्यांना त्यापासून निश्चितच प्रेरणा मिळेल. हा यामागील उददेश आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी, शेत नांगरणारा शेतकरी, टॅ्रक्टर चालविणारा शेतकरी, सिंचनाखालील शेत, कृषी पंपाने ओलीत करणारा शेतकरी, वडील शेतात काम तर त्यांचा मुलगा अधिकारी पदावर काम करीत असतांना असे आपल्याच कल्पनेतील नानाविध विषय चित्रकारांना रेखाटायची आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दर्शनी भागातील भिंती चित्रकारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी चित्रकार, शालेय व महाविदयालयीन विदयार्थी यांनी आपल्या नावाची नोंद बळीराजा चेतना कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे करावी. यासाठी प्रथम पारीतोषीक दहा हजार रुपये, द्वितीय पाच हजार तर तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाभरातील जास्तीत जास्त चित्रकार व विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)